Market Bulletin: शेवगा तेजीतचशेवगा दर सध्या तेजीतच आहेत. राज्यात प्रमुख्य बाजारात शेवग्याची आवक मर्यादित आहे. शेवग्याला चांगला उठाव मिळत आहे. त्यामुळे शेवग्याच्या दराला आधार मिळत आहे. राज्यात सध्या शेवग्याला सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांचा दर मिळत आहे. मागील दोन महिने पावसामुळे शेवगा पिकाला मोठा फटका बसला. त्यामुळे मालावर त्याचा परिणाम झाला. शेवगा उत्पादक पट्ट्यात माल कमीच आहे. त्यामुळे बाजरातील आवक कमी आहे. पुढील काही आठवडे बाजारातील आवक कमीच राहील, असा अंदाज व्यापारांनी व्यक्त केला आहे. .सोयाबीन दर कमीचराज्यात सोयाबीन काढणीला वेग आला आहे. त्यामुळे बाजारात आवाकही सुरु झाली आहे. परंतु बाजारातील भाव अद्यापही दबावातच आहे. राज्यातील खुल्या बाजारात सोयाबीनला सरासरी प्रतिक्विंटल ४ हजार ते ४ हजार १०० रुपयांचा दर मिळत आहे. हमीभावापेक्षा कमी दर असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. पुढील आठवड्यांमध्ये आवक वाढणार आहे. त्यामुळे सोयाबीन दरावर आवकेचा दबावही राहील. तसेच सध्या पावसामुळे बाजारात येणाऱ्या मालाची गुणवत्ता कमी झाली आहे. तसेच ओलावा अधिक असल्याने दर कमी असल्याचे जाणकारांनी सांगितले आहे..Orange Farmer Issue: वरुडबाजार समितीच्या संमतीने होतेय संत्रा बागायतदारांची लूट .बीटला उठावमागील दोन आठवड्यांपासून बीटची आवक कमीच आहे. यंदा पावसामुळे अनेक भागात लागवडी कमीच झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. तसेच अनेक ठिकाणी बीटच्या प्लाॅटचे पावसानेही नुकसान झाले. त्यामुळे मागील आवक कमी आहे. तर दुसरीकडे बीटला उठाव मात्र चांगला आहे. त्यामुळे सध्या बीटला १७०० ते २ हजारांचा दर मिळत आहे. बीटची बाजारातील आवक पुढील काही आठवडे स्थिर दिसू शकते. तर मागणी मात्र चांगली राहू शकते. त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केला..Custard Apple Season: यंदा सीताफळाचा हंगाम ‘गोड’ .वांगी दर टिकून राज्यातील बाजारात वांगीची आवक स्थिर आहे. पावसामुळे बहुतांश भागात वांगी पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आवक कमी झाली आहे. परंतु मागणी टिकून आहे. त्यामुळे दराला आधार मिळत आहे. हळूहळू वांगी आवकेत वाढ होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर वांग्याची मागणी आणि आवकेत वाढेल, असे चित्र आहे. राज्यातील प्रमुख बाजारात वांग्याला सरासरी २ हजार ७०० ते ३ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. पुढील काळात वांगी आवक वाढल्यास दरात काहीसे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत..सीताफळ आवक स्थिरसीताफळाचे बाजारातील आवक स्थिर आहे. मात्र उठाव आहे. त्यामुळे सीताफळाला दरही चांगला मिळत आहे. राज्यातील प्रमुख बाजारात चांगल्या मालाला सरासरी ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. सणांच्या काळात मागणी टिकून आहे. आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मागणी कायम आहे. त्यामुळे सीताफळाला दराला आधार मिळत आहे. प्रमुख सीताफळ उत्पादक भागात काढणीच्या वेळी पावसाने उघडीप दिल्याने माल चांगला राहिल्याचं शेतकरी सांगतात. तर उर्वरित राज्यात मात्र सीताफळाचे पावसामुळे नुकसान झाले. त्यामुळे सीताफळाची आवक बाजारात स्थिर आहे. पुढील काही आठवड्यात आवक स्थिर राहील. त्यामुळे सीताफळाच्या दरही टिकून राहतील, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.