Market Bulletin: उडदाचे भाव दबावातचदेशातील बाजारात उडदाचे भाव दबावातच आहेत. उडदाला हमीभावापेक्षा किमान १५०० ते २ हजार रुपये कमी भाव मिळत आहे. सध्या देशातील बाजारात नव्या उडादाची आवक सुरु आहे. मात्र, आवकेचा दबाव कमीच आहे. असे असले तरी आयातीचा दबाव कायम आहे. मागील वर्षभरात उडदाची आवक विक्रमी झाली. त्यामुळे देशात पुरवठा चांगला आहे. परिणामी उडादचे भाव ५ हजार ५०० ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत. पुढील काही आठवडे उडदाची बाजारातील आवक चांगली राहील. त्यामुळे दरावरही दबाव राहू शकतो, असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला..कांदा दर कमीचराज्यातील बाजारात कांद्याचे भाव कमीच आहेत. यामुळे शेतकरी आडचणीत आहेत. दिवाळीच्या पार्श्वभुमीवर कांद्याला मागणी येऊन दरात सुधारणा होईल,अशी अपेक्षा होती. मात्र आजपर्यंत दरावरील दबाव कायम आहे. कांद्याला आजही सरासरी ११०० ते १३०० रुपये दर मिळत आहे. बाजारातील कांद्याची आवक सरासरीपेक्षा चांगली आहे. कांदा बाजारात विक्रीसाठी येत आहे. मागणीप्रमाणे आवक होत असल्याने दरावर दबाव कायम आहे. कांद्याची बाजारातील आवक पुढील काही आठवडेही कायम राहू शकते. दिवाळीत मागणी आल्यानंतर दरात काहीसे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला..Ginning Pressing Industry: जिनिंग प्रेसिंग कारखाने दीपोत्सवानंतर धडाडणार.केळीचे दर स्थिरकेळीचे दर मागील काही आठवड्यांपासून राज्यातील बाजारात स्थिर आहेत. सप्टेंबर महिन्यात केळी पिकाला पावसाचा जोरदार दणका बसला. त्यामुळे बहुतांशी भागात केळी पिकाचे मोठे नुकसान झाले. परिणामी बाजारातील केळी आवकेवर परिणाम होत आहे. त्यामुळे दर टिकून राहण्यास मदत होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. केळी सध्या गुणवत्तेप्रमाणे १२०० ते १५०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. काही भागात भाव यापेक्षा कमी तर काही बाजारात जास्त आहे. केळीची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कायम राहू शकते. त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत..Raisin Market: झीरो पेमेंटसाठी बेदाण्याचे सौदे एक महिना बंद.कारलीला उठावराज्यातील बाजारात कारल्याची आवक मर्यादीत आहे. तर दुसरीकडे कारल्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे कारल्याचे भाव टिकून आहेत. इतर भाजीपाल्याप्रमाणे कारली पिकालाही जोरदार पावसाचा दणका बसला. अनेक भागात पिकाचे पूर्ण नुकसान झाले. तर काही भागात सततच्या पावसाने कारले पीक जळाल्याचेही शेतकरी सांगत आहेत. यामुळे बाजारातील आवक कमी झाली. सध्या कारली प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयाने विकली जात आहे. सध्या राज्यात केवळ पुणे, मुंबई, नाशिक आणि नागपूर बाजारात काल्याची आवक १०० क्विंटलपेक्षा अधिक आहे. इतर बाजारांमधील आवक कमीच आहे. पुढील काही आठवडे आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारल्याचे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत..गवार तेजीतचराज्यातील बाजारात गवारचे दर तेजीत आहेत. बाजारातील गवारची आवक कमी असल्याने दर टिकून आहेत. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने गवारचा बाजार गेल्या दोन महिन्यांपासून तेजीत आहे. गवारला आजही ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. पावसाने गवार पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागात पीक उध्दवस्त झाले. दर जास्त असूनही आवक न वाढण्याचे कारण म्हणजे मालच उपलब्ध नाही, असे शेतकरी सांगत आहेत. गवारची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.