Market Bulletin: कापूस आवक वाढलीदेशातील बाजारात कापसाची आवक वाढली आहे. दैनंदीन आवक २ लाख गाठींच्या दरम्यान पोचल्याचे उद्योगांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे बाजारभाव दबावातच आहेत. कापसाचा हमीभाव ८११० रुपये असताना बाजारात केवळ ६५०० ते ७ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गुणवत्तापूर्ण मालाचा भाव ७५०० रुपयांपर्यंत आहे. खुल्या बाजारातील भाव कमी असल्याने सीसीआयच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कापसाचे भाव पुढील काही दिवस दबावातच राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. .सोयाबीनमध्ये चढ उतारदेशातील बाजारात सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच असल्याचे व्यापारी सांगत आहेत. मध्य प्रदेशात भावांतर योजनेतून खरेदी सुरु आहे. तर महाराष्ट्रात हमीभावाने सोयाबीनची खरेदी केली जात आहे. महाराष्ट्रात कमी गुणवत्ता असलेले सोयाबीन खुल्या बाजारात विकावे लागत आहे. सोयाबीनला खुल्या बाजारात सध्या ४ हजार ते ४ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील महीनाभर सोयाबीनची आवक चांगली राहू शकते. त्यानंतर आवकेचा दबाव कमी होऊन दरालाही आधार मिळेल, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला..Pakistan Onion Production: पाकिस्तानच्या कांदा उत्पादनवाढीचे भारतीय कांद्यासमोर आव्हान.मका भाव दबावातचदेशातील बाजारात सध्या मक्याचे भाव दबावातच आहेत. मक्याची बाजारातील आवक चांगली आहे. तर दुसरीकडे मक्याला उठाव मर्यादीत आहे. याचा परिणाम मक्याच्या दरावर दिसत आहे. सध्या मक्याला बाजारात प्रतिक्विंटल सरासरी १४०० ते १७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर मक्याचा हमीभाव यंदा २४०० रुपयांच्या दरम्यान आहे. यंदा इथेनाॅलसाठी मक्याची मागणी कमी झाली. याचा दबाव दरावर आहे. मका बाजारातील ही स्थिती आणखी काही आठवडे दिसू शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला..Agrowon Podcast: कापूस दरांत चढ-उतार; सोयाबीनची आवक कमी, शेवगा तेजीतच, हरभरा दबावात तर मटारला उठाव.हिरवी मिरची तेजीतराज्यातील बाजारात सध्या हिरव्या मिरचीची आवक मर्यादीतच आहे. तर दुसरीकडे मिरचीला उठाव आहे. यामुळे हिरव्या मिरीचीचे दर टिकून आहेत. सध्या बाजारात मिरचीला सरासरी ३ हजार ते ३५०० रुपये दर मिळत आहे. पावसाचा मिरची उत्पादक पट्ट्याला जोरदार तडाखा बसला. यामुळे उत्पादन कमी झाले आहे. राज्यातील बहुतांशी बाजारांमधील आवक सरासरीपेक्षा कमी आहे. बाजारातील ही परिस्थिती आणखी काही दिवस राहू शकते. त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले..डाळिंब तेजीतचबाजारात दर्जेदार डाळिंबाची आवक खपूच आहे. तर दुसरीकडे अशा डाळिंबाला चांगला उठाव आहे. त्यामुळे दर्जेदार डाळिंबाचा भाव तेजीत आहे. या डाळिंबाचा भाव बाजारात ८ हजार ते १० हजारांच्या दरम्यान आहे. मात्र बाजारात कमी गुणवत्तेच्या डाळिंबाची आवक जास्त आहे. डाळिंबाला पावसाचा तडाखा बसलेला आहे. त्यामुळे गुणवत्ता कमी झाली. या डाळिंबाला बाजारात सरासरी १ हजार ते ३ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सततच्या पावसाने फळसडही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे पुढील काही आठवडे बाजारात दर्जेदार मालाचा तुटवडा राहण्याची शक्यता आहे. परिणामी या मालाचे दरही टिकून राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.