Market Bulletin: कापूस दर स्थिरदेशातील बाजारात कापसाच्या भावावर दबाव कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव मंदीतच आहेत. इंटरकाॅन्टीनेंटल एक्सचेंजवर म्हणजेच आयसीईवर कापसाचे वायदे ६७ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान आहेत. तर अमेरिकेने आता भारताच्या कापड आयातीवर ५० टक्के शुल्क लावले आहे. यामुळे निर्यातीवर परिणाम होणार आहे. या सर्व घडामोडींचा कापूस दरावर दबाव आहे. सध्या देशात कापसाची विक्री ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा देशातील बाजारावर परिणाम होत आहे. त्यामुळे कापसाचे भाव स्थिर राहतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. .मका बाजार स्थिरावलामक्याचे भाव देशातील बाजारात मागील काही महिन्यांपासून एकाच भावपातळीच्या दरम्यान स्थिर दिसत आहेत. मक्याला सध्या देशात इथेनाॅल, पोल्ट्री आणि स्ट्रार्च उद्योगाकडून उठाव मिळत आहे. मात्र इथेनाॅलसाठी देशात आता ५२ लाख टन तांदूळ सरकार देणार आहे. तसेच उसाचे उत्पादनही यंदा वाढण्याचा अंदाज असल्याने थेट उसाच्या रसापासून आणि मळीपासून इथेनाॅल निर्मिती वाढणार आहे. याचा परिणाम मक्याच्या दरावर होत आहे. मका २ हजार १०० ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. मक्याच्या दरात पुढील काळात काहीसे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. .Ethanol Supply Update: इथेनॉल पुरवठ्यात उत्तर प्रदेश आघाडीवर.टोमॅटोमध्ये काहीसे चढ उतार राज्यातील बाजारात टोमॅटोच्या बाजारात काहीसे चढ उतार सुरु आहेत. राज्यातील काही बाजारांमध्ये टोमॅटोच्या दरात क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांचे चढ उतार मागील आठवडाभरात दिसून आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तर बाजारातील टोमॅटोची आवक काही बाजारांमध्ये किंचित वाढल्याने हा परिणाम दिसल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या राज्यातील बाजारात टोमॅटोला सरासरी ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांचा दर मिळत आहे. तर कमाल दर ४ हजारांच्याही पुढे काही बाजारांमध्ये दिसून आला. टोमॅटोच्या भावातील ही स्थिती आणखी काही आठवडे दिसू शकते, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. .Agrowon Podcast: सोयाबीन व गवार दर टिकून; आले-पपई दरात सुधारणा, तर भेंडी दर स्थिर.डाळिंबाला उठाव कायम देशात गेल्या दोन वर्षांपासून डाळिंबाचे उत्पादन कमी होत आहे. मागील काही महिन्यांपासून बाजारातील आवक कमी असल्याने डाळिंबाचे भाव तेजीत आहेत. बाजारात विक्रीसाठी येत असलेल्या डाळिंबाची गुणवत्ता कमी असल्याने राज्यात गुणवत्तापूर्ण डाळिंबाची टंचाई भासत आहे. परिणामी या डाळिंबाचे दर तेजीत आहेत. सध्या डाळिंबाला बाजारात सरासरी ९ हजार ते १२ हजार रुपयांचा दर मिळत आहे. बाजारातील डाळिंबाची आवक मर्यादीतच राहण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे उठाव चांगला राहील. त्यामुळे डाळिंबातील तेजी टिकून राहील, असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. .केळीला मागणी कायम राज्यात श्रावण महिन्यामुळे केळीला चांगला उठाव मिळत आहे. त्यातच राज्यात दर्जेदार केळईचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे दर टिकून आहेत. परंतु श्रावण महिन्यातील वाढलेली मागणी आणि कमी पुरवठा याचा अपेक्षेप्रमाणे दराला आधार मिळाला नाही, असे शेतकरी सांगत आहेत. सध्या राज्यात केळीला सरासरी १ हजार ५०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. तर किरकोळ दर ४० रुपये ते ७० रुपये प्रतिडझन आहेत. पुढील काळात श्रावण आणि गणपतीमुळे केळीला उठाव राहणार आहे. त्यामुळे केळीचे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.