Market Bulletin : आवळ्याला कमी उठावबाजारात सध्या आवळ्याला कमी उठाव आहे. तसेच बाजारातील आवकही कमी झाली. पावसाने राज्यभारत आवळा पिकाला दणका दिला. त्यामुळे माल कमी येत असल्याचे बाजारातील व्यापारी सांगत आहेत. सध्या बाजारातील केवळ मुंबई बाजारातील आवक जास्त दिसत आहे. पुणे, नाशिक, जळगाव बाजारातील आवक कमी आहे. तर सध्या आवळा गुणवत्तेनुसार प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ५०० ते ५ हजार रुपयाने विकला जात आहे. तसेच आवळ्याला पुढील काही आठवडे मागणी कमीच राहू शकते. त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. .हिरवी मिरची नरमलीहिरव्या मिरचीची बाजारातील आवक कमी झाल्यानंतर मागील ३ आठवड्यांमध्ये दरात काहिसी नरमाई दिसून आली. हिरव्या मिरचीला उठाव चांगला असल्याने दरातील नरमाई स्थिरावली आहे. तसेच मागील ५ दिवसांमध्ये झालेल्या पावसाचा मिरची पिकाला पुन्हा फटका बसत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्या हिरव्या मिरचीला सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपये दर मिळत आहे. मुंबई बाजारात मिरचीला चांगला उठाव मिळत आहे. पुणे बाजारातही मिरचीची आवक चांगली आहे. राज्याच्या इतर भागातील मिरची आवक कमी आहे. पुढील काही आठवडे बाजारातील मिरची आवक चांगली राहू शकते, असा अंदाज मिरची बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत..Agrowon Podcast: हरभरा दर दबावातच; शेवगा दर तेजीतच, भेंडीला चांगला उठाव, मोसंबी आवक टिकून तर सोयाबीनचे दर दबावातच.लिंबुचे दर टिकूनबाजारातील लिंबुची आवक मागील काही दिवसांपासून कमी दिसत आहे. लिंबू पिकालाही पावसाचा दणका बसला. त्यामुळे गुणत्तापूर्ण मालाची आवक झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. लिंबुला बाजारात उठाव कमी असला तरी दुसरीकडे आवकही कमी आहे. त्यामुळे बाजारातील स्थिरावले आहेत. पुणे आणि मुंबई बाजारात लिंबाची आवक चांगली आहे. त्यामुळे बाजारात सध्या १५०० ते २ हजाराने लिंबू विकले जात आहे. मात्र राज्यातील इतर बाजारांमध्ये आवक कमी झाली. त्यामुळे या बाजारांमध्ये लिंबाला ३ हजारांपर्यंतही दर मिळत आहे. बाजारातील लिंबाची आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता असल्याचे जाणकारांनी सांगितले..Soybean Price: अपेक्षित दर नसल्याने सोयाबीन नेले परत.लसणाचे दर स्थिरराज्यात मागील काही आठवड्यांपासून लसणाचे दर स्थिरावलेले दिसत आहेत. लसणाची बाजारातील आवक वाढल्यानंतर दरात नरमाई आली होती. दुसरीकडे लसणाला उठाव चांगला आहे. मागील काही दिवसांपासून बाजारातील आवकेवर पावसाचा परिणाम दिसत आहे. त्याचा आधार लसणाला मिळाला. सध्या लसूण सरासरी ५ हजार ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे. बाजारातील लसणाची आवक पुढील काही आठवडे स्थिर राहू शकते. मात्र काही आठवड्यांनंतर बाजारात नव्या मालाची आवकही सुरु होईल. त्यामुळे लसणाच्या दरावर दबाव वाढू शकतो, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत..सिताफळाची आवक वाढलीबाजारांमध्ये सध्या सिताफळाची आवक वाढली आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, अमरावती बाजारात आवक वाढल्याचे दिसत आहे. बाजारात आवक वाढल्याचा दबाव दरावर येत आहे. सिताफळाचे दर बाजारात नरमले आहेत. राज्यात सरासरी ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे सिताफळाची विक्री केली जात आहे. तर गुणवत्तापूर्ण मालाला मुंबई बाजारात आज ८ हजारांचाही भाव मिळाला. सध्या बाजारात गुणवत्तापूर्ण मालाची आवक कमी आहे. त्यामुळे हा दर दिसून आला, असे व्यापाऱ्यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.