Market Bulletin:कापसाचे भाव दबावातचआंतरराष्ट्रीय बाजारात घडामोडी आणि व्यापार युध्दामुळे कापसाच्या भावावरील दबाव कायम आहे. अमेरिकेने भारतावरही ५० टक्के शुल्क लावल्याने कापड निर्यातीवर परिणाम होत आहे. याचा दबाव दरावर आला आहे. देशातील कापसाचा वापर कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सध्या कापसाचे भाव नरमलेले दिसत आहेत. कापूस खंडीचा भाव सीसीआयने २५०० रुपयाने कमी केला आहे. यंदा कापसाची लागवड कमी झाली. तसेच पिकाला पावसाचाही फटका बसत आहे. त्यामुळे चालू हंगामात कापसाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता असली तरी कापसाला कमी उठाव राहून, कापसाचे भाव दबावातच राहण्याची शक्यता आहे, असे अभ्याकांनी सांगितले. .सोयाबीनचे दर स्थिरावलेदेशातील बाजारात सोयाबीनचे भाव दबावातच आहेत. सोयाबीनची लागवड यंदा कमी झाली. तसेच पावसाचाही फटका सोयाबीन पिकाला बसत आहे. त्यामुळे यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा दबाव दरावर दिसू शकतो. सरकारने यंदा सोयाबीनला ५ हजार ३२८ रुपये हमीभाव जाहीर केला. देशात सोयापेंडला डीडीजीएसचा पर्याय यंदाही असणार आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली तरी सोयाबीनचा भाव हमीभावाचा टप्पा पार करण्याची यंदाही शक्यता कमीच असल्याचे अभ्यासकांनी सांगितले..Banana Rate: केळी दर निश्चिती बाबतप्रशासनाची चालढकल.लाल मिरचीची आवक मर्यादीतलाल मिरचीला सध्या चांगली मागणी आहे. पुढे सणासुदीच्या काळातही लाल मिरचीला चांगला उठाव मिळणार आहे. देशात गेल्या हंगामात लाल मिरचीचे उत्पादन वाढले होते. त्यामुळे दरावर काहीसा दबाव दिसून आला. आजही गेल्यावर्षीपेक्षा लाल मिरचीचे दर दबावातच आहेत. सध्या लाल मिरचीला सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. लाल मिरचीला सणांमुळे प्रक्रिया उद्योगांमधूनही मागणी वाढत आहे. तर यापुढच्या काळात बाजारातील आवक कमी होत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाल मिरचीचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केला..Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी .शेवग्याला चांगला उठावबाजारातील शेवग्याची आवक पुन्हा काहिशी कमी झाली आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने शेवगा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे शेवग्याचा तोडा कमी होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. शेवग्याची बाजारातील आवक कमी असली तरी सणासुदीच्या पार्श्वभुमीवर शेवग्याला चांगली मागणी आहे. याचा आधार शेवग्याच्या दराला मिळत आहे. सध्या बाजारात शेवग्याला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ५०० ते ४ हजार रुपये दर मिळत आहे. पुढील काळात शेवग्याची आवक जास्त वाढण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे शेवग्याचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज शेवगा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत. .आल्याचे दर तेजीतचबाजारातील आल्याची आवक कमी झाल्यापासून दरात सुधारणा दिसून येत आहे. मागील महीनाभरातच आल्याचे दर क्विंटलमागे १५०० रुपयाने वाढले आहेत. मागील काही महीने आल्याच्या भावात मंदी होती. आल्याचे भाव २ हजारांच्याही खाली काही बाजारात आले होते. परंतु बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होत गेली. सध्या आले ४ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकले जात आहे. पुढील काळात सणासुदीमुळे आल्याला चांगला उठाव राहील. त्यामुळे आल्याच्या दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केला. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.