संत्रा दर दबावातचराज्यातील बाजारात संत्र्यांची आवक सुरु झाली. काही बाजारांमध्ये आवक काहीशी वाढली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून पावसाचाही दणका संत्रा पिकाला बसत आहे. तसेच ढगाळ वातावरणाचाही फटका पिकाला बसत आहे. राज्यात सध्या संत्रा ३ हजार ५०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. बाजारात आवक होणाऱ्या मालाची गुणवत्ता सध्या कमी दिसत आहे. गुणवत्तापूर्ण संत्रा सध्या ६ हजार ते ७ हजाराने विकला जात आहे. पावसाचा दणका बसल्याने बाजारातील माल कमी असल्याचे व्यापारी सांगत आहेत. पुढील काही आठवडे संत्रा बाजारातील आवक आणि दर स्थिर दिसू शकतात, असा अंदाज संत्रा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला..लिंबुची आवक कमीचराज्यातील बाारात लिंबुची आवक मागील दोन आठवड्यांपासून कमी झाली आहे. राज्यात सुरु असलेल्या पावसाचा लिंबू पिकाला मागील दोन आठवड्यांपासून बसत आहे. सप्टेंबरमधील पावसाने पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे लिंबू उत्पादकांनी सांगितले. याचा परिणाम आवकेवर आणि दरावर झाला आहे. सध्या बाजारात लिंबाला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ४ हजार रुपये दर मिळत आहेत. सध्या लिंबाला मागणीही काहीशी वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत. लिंबाची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे लिंबाचे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत..Soybean Rate : देशात सोयाबीनचे दर वाढण्याचे संकेत.लसणाचे दर टिकूनराज्यातील बाजारात लसणाचे भाव टिकूण आहेत. खरिपात लागवड झालेल्या लसणाचे राज्यातील अनेक भागात पावसाने नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारातील आवक कमीच दिसत आहे. तसेच वातावरणात होत असलेल्या बदलाचा गुणवत्तेवरही परिणाम जाणवत आहे. त्यामुळे बाजारातील आवक कमी होऊन दराला आधार मिळत आहे. सध्या लसणाचे भाव प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत. बाजारातील लसणाची आवक पुढील काही आठवडे मर्यादीतच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज लसूण बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला..Banana Market : हिंगोली जिल्ह्यात केळीचे दर गडगडले.भेंडीला उठावराज्यातील बाजारात सध्या भेंडीला उठाव आहे. नवरात्रीच्या काळात भेंडीची मागणी वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर दुसरीकडे पावसामुळे इतर भाजीपाल्याप्रमाणे भेंडीचीही बाजारातील आवक कमी झाली. भेंडीला बाजारात सध्या प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ५०० ते ४ हजार रुपये दर मिळत आहे. भेंडी पिकाला राज्यात पावसाचा मोठा दणका बसलेला आहे. अनेक भागात पिकाचे मोठे नुकसान झाले. तर काही ठिकाणी सततच्या पावसाने पिकाची काढणीही शक्य होताना दिसत नाही. त्यामुळे पुढील काही दिवस तरी बाजारातील आवक कमीच राहील आणि दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासू शेतकरी व्यक्त करत आहेत..बेदाणा दर तेजीतबाजारात सध्या बेदाण्याची आवक कमी झाली आहे. काही भागात पावसामुळे बेदाण्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होत असल्याचे कही उत्पादकांनी सांगितले. तर दुसरीकडे सणासुदीच्या काळात बेदाण्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे दरही तेजीत आहेत. सध्या बेदाण्याला प्रतिक्विंटल सरासरी २६ हजारे ३२ हजार रुपेय दर मिळत आहे. सध्या सांगली आणि नाशिक जिल्ह्यातील बाजारांमध्ये बेदाण्याची आवक काहीशी बरी दिसत आहे. तरीही गुणवत्तापूर्ण मालाचा बाजारात तुटवडा आहे. बेदाण्याची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कमीच राहून दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.