Market Bulletin: केळीचे दर स्थिरऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात केळी पिकाला पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. केळीची गुणवत्ता कमी झाली आहे. बाजारात आवक कमी आहे. केळीला मागणी मात्र कायम असल्याने सध्या सरासरी १००० ते १ हजार २०० रुपये दरम्यान दर मिळत आहे. मागील आठवड्यापासून कमी आवकेमुळे बाजारात दर स्थिर आहेत. पुढील काही आठवडे आवक कायम राहून दर स्थिर राहतील, असे केळी बाजारातील जाणकारांनी सांगितले आहे. .ज्वारीचे दर कायमराज्यातील प्रमुख बाजारात ज्वारीला सध्या सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार ७०० रुपये दर मिळत आहे. बाजारातील आवक कमीच आहे. त्यामुळे मागील आठवड्यापासून ज्वारीला काहीसा आधार मिळाला आहे. मॉन्सून हंगामात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे ज्वारीऐवजी नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल आहे. पुढील काळात ज्वारीची आवक कायम राहील. त्याचा दराला आधार मिळाल्याने दर टिकून राहतील, असे शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सांगितले. तर ज्वारीच्या दरात पुढील काळात काहीशी सुधारणा दिसून येईल, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत..Papaya Price: खानदेशात पपई दर २० ते २५ रुपये किलो.शेवगा तेजीतशेवगा दर सध्या तेजीतच आहेत. राज्यात प्रमुख्य बाजारात शेवग्याची आवक कमीच आहे. शेवग्याला चांगला उठाव मिळत आहे. त्यामुळे शेवग्याच्या दराला आधार मिळत आहे. राज्यात सध्या शेवग्याला सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांचा दर मिळत आहे. मागील दोन महिने पावसामुळे शेवगा पिकाला मोठा फटका बसला. त्यामुळे गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. शेवगा उत्पादक पट्ट्यात माल कमीच आहे. त्यामुळे बाजरातील आवक कमी आहे. पुढील काही आठवडे बाजारातील आवक कमीच राहील, असा अंदाज व्यापारांनी व्यक्त केला आहे..Cotton Rate: धामणगाव रेल्वे बाजार समितीत कापसाला ७११० रुपयांचा दर.हिरव्या मिरचीला उठावमागील आठवड्यात हिरव्या मिरचीचे दर काहीशी नरमले होते. बाजारात आवक वाढली आहे. त्यामुळे मिरचीच्या दरावर परिणाम झाला. परंतु चालू आठवड्यात मात्र हिरव्या मिरची दराने उठाव घेतला आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात मिरची पिकाला फटका बसला. त्यामुळे मिरची उत्पादकांचं नुकसान झालं. परंतु सध्या मात्र मिरचीला प्रमुख बाजारात सरासरी ३ ते हजार ४०० ते ४००० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. मिरचीच्या आवकेत आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरात काही प्रमाणात चढ-उतार होऊ शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी दिला आहे..गव्हाला मागणीचा आधारकेंद्र सरकारने नुकतेच गव्हाचे हमीभाव जाहीर केले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत गव्हाच्या हमीभावात प्रतिक्विंटल १६० रुपयांची वाढ केली आहे. परंतु गव्हाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार बाजारावर लक्ष ठेवून आहे. यंदाच्या रब्बीत गव्हाच्या सरकारी खरेदी वाढली. परंतु केंद्र सरकारचं गव्हाच्या बाजारावर लक्ष आहे. त्यामुळे दरावर काहीसा दबाव आहे. परंतु मागील दोन महिन्यांपासून मागणीचा आधार गव्हाच्या बाजाराला मिळाला आहे. बाजारात आवकही कमीच आहे. मात्र तरीही अपेक्षेप्रमाणे दर मिळत नाही. राज्यातील बाजारात गव्हाला सरासरी प्रतिक्विंटल २ हजार ४०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. पुढील काही आठवडे सणांच्या पार्श्वभूमीवर दर पातळीत काहीशी सुधारणा होईल, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.