Market Bulletin: सोयाबीन भावात वाढसोयाबीन बाजारात काहीशी वाढ झाली आहे. सोयाबीनला उठाव चांगला आहे. तर बाजारातील आवक कमी आहे. त्यामुळे प्रमुख सोयाबीन बाजारात आज दरात काहीशी वाढ पाहायला मिळाली. बहुतांश बाजारात २०० ते २५० रुपयांची दरात वाढ झाली आहे. राज्यातील प्रमुख सोयाबीन बाजारात सरासरी प्रति क्विंटल ५ हजार ५०० ते ६ हजार रुपयांच्या दर सोयाबीनचे व्यवहार झाले.सोयाबीनला उठाव कायम राहील, अशी शक्यता आहे.त्यामुळे सोयाबीनचे बाजारभाव पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे..कापसाचे दर टिकूनकापूस बाजारात कापसाचे दर टिकून आहेत. बाजारातील आवकही खूपच कमी आहे. त्यामुळे कापसाला उठाव कमी असल्याने दर मागील काही आठवड्यापासून कायम आहेत. देशातील प्रमुख बाजारात कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ८ हजार २०० ते ८ हजार ७०० रुपयांचा दर मिळत आहे. तर राज्यातील प्रमुख बाजारात याच दरम्यान दर मिळत आहे. कापसाचा उठाव टिकून आहे. त्यामुळे दरही मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत. पुढील काळातही उठाव राहील. त्यामुळे कापसाचे दर पुढील काळातही कायम राहतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Agriculture Market Update: कोथिंबीर, मेथीच्या दरात सुधारणा.गव्हावर दबावदेशात गव्हाची कापणी वेगात सुरु आहे. त्यामुळे गहू बाजारात आवकही वाढली आहे. त्यामुळे गव्हाच्या दरावर दबाव पाहायला मिळत आहे. देशातील प्रमुख बाजारात गव्हाचे दर दबावात आहेत. केंद्र सरकारने नुकतीच २५ लाख टन गहू निर्यातीला परवानगी दिली आहे. परंतु त्यामुळे बाजाराला मोठा उठाव मिळण्याची शक्यता नाही. सध्या गव्हाला बाजारात प्रति क्विंटल सरासरी २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. प्रमुख गहू उत्पादक राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा गव्हाला फटका बसल्याने काहीशी उत्पादकता घटली आहे. काढणी सुरु असल्याने बाजारात पुढील काळात आवक चांगली राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गव्हाच्या दरावर दबाव राहील, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे..Banana Prices Rise: उत्तरेच्या बाजारात केळीस उठाव.तुरीचे दर स्थिरदेशातील बाजारात तुरीचे दर स्थिर आहेत. मागील आठवड्यात तूर बाजारात चढ-उतार दिसून आले होते. सध्या राज्यातील प्रमुख बाजारात तुरीची आवक कमी आहे. तर तुरीला उठाव चांगला आहे. परंतु तुरीचे दर मात्र हमीभावापेक्षा कमीच आहेत. तुरीला सध्या बाजारात सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तुरीची आयातही सुरु आहे. तुरीचा भाव काही दिवस स्थिर राहू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..बाजरीची आवक कायमदेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून बाजरीची आवक स्थिरावली आहे. तर वाढत्या उन्हामुळे बाजरीची मागणीही काही प्रमाणात कमी झाली आहे. याचा परिणाम दरावरही दिसून येत आहे. बाजरीला सध्या सरासरी २ हजार ३०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजरीची बाजारातील आवक पुढील काही आठवडे चांगली राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे बाजरीचे भाव सध्याच्या भावातळीच्या दरम्यान पुढील काही आठवडे राहू शकतात, असा अंदाज बाजरी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.