
Sangli News: सांगली जिल्ह्यातून यंदाच्या हंगामात १० हजार १६५ शेतकऱ्यांनी १७ हजार ८९७ टन द्राक्षाची निर्यात केली आहे. दरवर्षी द्राक्ष निर्यातीचा आलेख वाढत असतानाच यंदाच्या हंगामात अति पाऊस आणि उत्पादन घटल्याचा फटका द्राक्ष निर्यातीला बसला आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात १ हजार ३१० टनांनी द्राक्षाची निर्यात घटली आहे.
जिल्ह्यातून दरवर्षी द्राक्ष निर्यातीस शेतकरी पुढाकार घेत असून निर्यातीसाठी शेतकऱ्यांची संख्याही वाढत असल्याचे चित्र आहे. प्रतिकूल परिस्थितीतही द्राक्ष निर्यातीचा आलेख वाढत आहे. गतवर्षी ९ हजार ६२६ शेतकऱ्यांनी १९ हजार २०७ टन द्राक्षाची निर्यात केली होती. जिल्ह्यातून यंदाच्या हंगामात सर्वाधिक द्राक्ष निर्यात करण्याचे धोरण कृषी विभागाने आखले होते.
त्यानुसार शेतकऱ्यांनी नोंदणीचे कामही तालुका स्तरावर केले. त्यामुळे यंदाच्या हंगामात १० हजार १६५ शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी केली. अर्थात, निर्यात करण्यासाठी ५३९ ने संख्या वाढली. त्यामुळे गतवर्षीच्या तुनेलत यंदा निर्यात अधिक होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्तही केला होता.
यंदा द्राक्ष फळ छाटणीपासूनच पावसाला सुरुवात झाली. सततच्या पावसामुळे फळ छाटणीच्या नियोजनात अडथळे निर्माण झाले. त्यातून शेतकऱ्यांनी छाटणी केली. परंतु सततच्या बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्ष पिकाला बसला. यामुळे उत्पादन घटले. त्याचा परिणाम निर्यातीवर झाला.
सुरुवातीला निर्यात संथ गतीने होती. त्यानंतर गती आली. युरोपियन देशात ७३१ कंटेनरमधून ९८५९ टन तर आखाती देशात ५४२ कंटेनरमधून ८०३८ टन असे एकूण १२७३ कंटेनरमधून १७८९७ टन द्राक्षाची निर्यात झाली. निर्यातक्षम द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात असताना वादळी वाऱ्यासह अनेक भागांत पावसाने हजेरी लावल्याने द्राक्षाचे पुन्हा नुकसान झाले. त्यामुळे निर्यात थांबली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.