Agricultural Reform: अन्नसुरक्षा, शेतकरी हक्क, डिजिटल शेती आणि हवामान बदलाला तोंड देणाऱ्या शाश्वत शेतीसंदर्भातील अनेक महत्त्वपूर्ण संयुक्त उपक्रमांची घोषणा ‘ब्रिक्स’ परिषदेत कृषिमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली..भारताच्या अध्यक्षतेखाली इंदूर येथे पाचदिवसीय ब्रिक्स परिषदेचा समारोप शनिवारी (ता. १३) समारोप झाला.बैठकीनंतर केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले, की कृषी क्षेत्रातील सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी सदस्य देशांनी अनेक नवीन संस्थात्मक यंत्रणा उभारण्यास सहमती दर्शविली असून, त्यातील अनेक उपक्रमांचे समन्वय भारत करणार आहे..ब्रिक्स परिषदेमध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांसह इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि इंडोनेशिया आदी देश सहभागी झाले..Agriculture Development: कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न.बैठकीतील प्रमुख निर्णयांनुसार, बियाणे व्यवस्थेतील शेतकऱ्यांचे हक्क आणि पारंपरिक ज्ञानाचे संरक्षण करण्यासाठी ‘बियाणे व्यवस्थेतील शेतकरी हक्कांसाठी जागतिक मंच’ (ग्लोबल फोरम ऑन फार्मर्स राइट्स इन सीड सिस्टिम) स्थापन करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा समन्वयक भारत असणार आहे..तसेच कृषी निविष्ठा, जनुकीय साधने आणि माहितीची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी ‘ब्रिक्स ॲग्रिन नेटवर्क’ स्थापन करण्यासही सदस्य देशांनी मंजुरी दिली. या नेटवर्कचे समन्वयही भारत करणार असल्याचे कृषिमंत्री चौहान यांनी सांगितले. अन्नधान्य व्यापार आणि पुरवठा साखळी अधिक मजबूत करण्यासाठी प्रस्तावित ‘ब्रिक्स धान्य विनिमय मंच’ (ब्रिक्स ग्रेन एक्स्चेंज या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत चर्चाही पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला..हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी कृषी पर्यावरणशास्त्र आणि पुनरुत्पादक शेती क्षेत्रात ‘ब्रिक्स उत्कृष्टता केंद्रांचे जाळे’ (ब्रिक्स सेंटर ऑफ एक्सलन्स नेटवर्क) स्थापन करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभिक समन्वय भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत (आयसीएआर) असलेल्या संस्थेकडून केला जाईल..Agriculture Development: ‘आयएएस’ करतील शेतीचा कायापालट.याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), भू-स्थानिक तंत्रज्ञान आणि इतर डिजिटल उपायांचा कृषी क्षेत्रात वापर वाढविण्यासाठी डिजिटल कृषी नेटवर्क स्थापन करण्यालाही मंजुरी देण्यात आली. या नेटवर्कचा प्रारंभिक समन्वय आयआयटी दिल्ली करणार आहे..कृषिमंत्री चौहान यांनी सांगितले, की हे सर्व उपक्रम लघू व अल्पभूधारक शेतकऱ्यांना सक्षम बनविणे, अन्नसुरक्षा मजबूत करणे आणि शेती अधिक शाश्वत व हवामान-प्रतिरोधक बनविणे या उद्देशाने राबविले जाणार आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.