
Nagpur News : शेतकऱ्यांच्या घरात १८ टक्के कापूस शिल्लक असतानाच भारतीय कापूस महामंडळाकडून(सीसीआय) आजपासून (ता.१५) नोंदणी पर्यायाने ‘खरेदी बंद’ करण्याचा घाट घालण्यात आला आहे. परिणामी कापसाचे दर आधीच हमीभावापेक्षा कमी असताना ते आणखी दबावात येण्याची भीती वर्तविली जात आहे.
देशात सरासरी १३० लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होते. या वर्षी हे क्षेत्र ११३ लाख हेक्टरवरच मर्यादित राहिले. त्यामागे कापसाचे दर दबावात राहत असल्याचे कारण मुख्य होते. मात्र पर्याय नसल्याने शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली.
महाराष्ट्रात सुमारे ४० लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली. देशातील एकूण ११३ लाख हेक्टर क्षेत्रातून १४७५ लाख क्विंटल, तर महाराष्ट्रात ४० लाख हेक्टर क्षेत्रातून ३७० लाख क्विंटल उत्पादकता अपेक्षित असल्याचे कापूस विपणन क्षेत्रातील तज्ज्ञ गोविंद वैराळे यांनी सांगितले.
यातील मोठ्या कापसाची विक्री झाली असून सध्या देशभरात २५० ते ३०० लाख क्विंटल, तर महाराष्ट्रात ६० ते ७० लाख क्विंटल कापूस शिल्लक आहे. भाववाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक करीत विक्रीला ब्रेक लावला होता.
मात्र दरात वाढ होण्याची अपेक्षा नसल्याने आता साठवणीतला कापूस विक्रीसाठी बाहेर काढला जात आहे. त्यातच ‘सीसीआय’कडून हमीभाव खरेदी गुंडाळण्याची तयारी सुरू असल्याने कापसाच्या दरात प्रती क्विंटल २५० ते ३०० रुपयांची घसरण होण्याची भीती वर्तविली जात आहे.
एक कोटी कापूस गाठींची खरेदी
‘सीसीआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी ललित कुमार गुप्ता यांच्या माहितीनुसार, सीसीआयने देशभरात एक कोटी कापूस गाठींची खरेदी केली आहे. यापुढील काळात १५ ते २० लाख कापूस गाठी इतकी आवक होण्याचा अंदाज त्यांनी वर्तविला. कापूस हंगाम अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.