Tur Market: तूर ९ हजारांचा टप्पा गाठणार?

शातील बाजारात तुरीची आवक वाढत आहे. राज्यातील जालना, अकोला, लातूर बाजारात आवक जास्त होत आहे.
Tur Market
Tur MarketAgrowon

अनिल जाधव
पुणेः देशातील बाजारात तुरीची आवक (Tur Arrival) वाढत आहे. राज्यातील जालना, अकोला, लातूर बाजारात आवक जास्त होत आहे.

पुढील काही दिवसांमध्ये आवकेचा दबाव वाढेल. पण यंदा देशातील तूर उत्पादन कमी राहणार आहे. त्यामुळे यंदा तुरीचे दर (Tur Rate) तेजीतच राहण्याचा अंदाज आहे.  

यंदा खरिपातील लागवड घटल्याचं स्पष्ट झाल्यानंतर तुरीच्या दरानं उचल घेतली. ऑगस्ट महिन्यापर्यंत ६ हजार रुपयांपेक्षा कमी दरात विकल्या गेलेली तूर टप्प्यटप्प्यानं वाढली.

सप्टेंबर महिन्यात तुरीनं ७ हजारांचा टप्पा गाठला. पण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात पावसानं पिकांचं नुकसान झालं.

त्यामुळं उत्पादनात जास्त घट होणार, हेही स्पष्ट झालं. सरकारनंही यंदा उत्पादन अंदाजात जवळपास ५ लाख टनांनी कपात करून ३९ लाख टनांचा अंदाज व्यक्त केला. त्यामुळं तुरीनं ८ हजारांचा टप्पा गाठला.

Tur Market
Balck Gram : उडदानेही गाठला ८ हजारांचा टप्पा

देशातील तूर उत्पादन घटणार, हे स्पष्ट झाल्यानंतर सरकारनंही आयातीवर जोर दिला. मुक्त आयात धोरण स्विकारलं.

आयात नियमात बदल केले. तसंच देशातील बाजारात तुरीची आवक सुरु झाल्यामुळं दर काहीसे नरमले. पण मागणी चांगली असल्यानं दर आजही चांगले आहेत.

देशातील बाजारात सध्या तुरीला सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपये दर मिळतोय. तर यंदा सरकारनं ६ हजार ६०० रुपये हमीभाव जाहीर केला.

उत्पादनाचे अंदाज
सरकारनं यदा ३९ लाख टन तूर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. तर जाणकारांच्या मते यंदा देशातील उत्पादन ३० ते ३२ लाख टनांच्या दरम्यान राहील.

अॅग्री वर्ल्ड या संस्थेने नुकतेच कर्नाटक, महाराष्ट्रातील तूर पिकाचे सर्वेक्षण केले. यंदा महाराष्ट्रातील तूर उत्पादन २५ ते ३० टक्के कमी राहील.

तर कर्नाटकातील उत्पादन ३० ते ४० टक्क्यांनी घटेल, असा निष्कर्ष या संस्थेने काढला. त्यामुळं उत्पादन घटीच्या अंदाजाला आधार मिळाला.

Tur Market
Wheat Market : गहू दर विक्रमी टप्पा गाठणार


आयात किती होऊ शकते?

उत्पादन घटीमुळं दर वाढू शकतात. त्यामुळं यंदा सरकारनं ९ ते १० लाख टनांपर्यंत तूर आयातीचं उद्दीष्ट ठेवलं.

पण १० लाख टन तूर आयात झाली तरी पुरवठा मागणीपेक्षा जास्त वाढणार नाही. त्यामुळं तुरीला यंदा चांगला दर मिळू शकतो.

काय मिळू शकतो दर?
बाजारातील अभ्यासकांच्या मते, यंदा सरासरी भावपातळी ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकते.

तर जास्तीत जास्त ९ हजार रुपये दर मिळू शकतो. कारण यापेक्षा दर जास्त वाढल्यास सरकार बाजारात हस्तक्षेप करु शकते.

त्यामुळं सरकारच्या निर्णयावरच तुरीचा जास्तीत जास्त अर्थात कमाल भाव अवलंबून असेल, असंही बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com