
Nanded Chana Bajarbhav : जिल्ह्यात सध्या शेतकरी नवीन हरभरा विक्रीसाठी (Chana Sell) बाजारात आणत आहेत. परंतु बाजारात दर पडल्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे.
हरभऱ्याला शासनाचा किमान हमी दर ५३३५ रुपये प्रतिक्विंटल असताना बाजारात सरासरी ४३८० रुपये दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शासनाचे हमी दर खरेदी केंद्र वाढविण्याची मागणी केली आहे.
नांदेड जिल्ह्यात यंदा रब्बीमध्ये दोन लाख ७७ हजार हेक्टरवर हरभऱ्याची लागवड झाली आहे. सध्या हरभऱ्याची काढणी झाल्यानंतर शेतकरी विक्रीसाठी शासनाच्या हमी दर खरेदी केंद्राची प्रतिक्षा करीत आहेत.
परंतु यंदा शासनाकडून हरभरा खरेदी केंद्राच्या संख्येत घट केली आहे. मागील वर्षी पाच संस्थांची ८० च्यावर खरेदी केंद्र होते. परंतु यंदा ३० पर्यंतच खरेदी केंद्र आत्तापर्यंत सुरु झाली आहेत.
अनेक भागातील शेतकऱ्यांनी खरेदीपूर्वी विक्री नोंदणी करण्यासाठी मागील वर्षी सुरु झालेल्या खरेदी केंद्राकडे अर्ज दाखल केले आहेत. परंतु नाफेडकडून अद्याप या खरेदी केंद्राच्या पोर्टलची सुरवात केली नसल्याने शेतकऱ्यांची नोंदणी झाली नाही.
परिणामी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात हरभरा विकावा लागत आहे. अनेक शेतकरी शासकीय हरभरा खरेदी केंद्र सुरु होण्याची वाट पाहत आहेत.
परंतु स्थानिक विक्रीत व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांचा माल पडक्या दरात घेत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
नांदेड बाजार समितीच्या नवा मोंढा बाजारात बुधवारी (ता. १५) ४४७ कट्ट्याची आवक झाली. यास कमाल ४४१०, किमान ४२६०० रुपये प्रतिक्विंटल दर आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटल एक हजार रुपयाचे नुकसान होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.