
Pune News: केंद्र सरकारने कच्चे सोयातेल, पामतेल आणि सूर्यफुल तेल आयात शुल्कात १० टक्क्यांची कपात केली. यामुळे तेलाचे भाव कमी होणार आहेत. याचा थेट दबाव सोयाबीनच्या भावावर येणार आहे. यामुळे सोयाबीनला हमीभाव मिळण्याची शक्यताही धुसर आहे, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारने बुधवारी मोठा गाजावाजा करत सोयाबीनच्या हमीभावात जवळपास ८ टक्क्यांची वाढ केली. सोयाबीनचा हमीभाव ५ हजार ३२८ रुपयांवर पोचल्याने शेतकऱ्यांमध्येही काहीसे समाधान होते. पण सरकारने तिसऱ्याच दिवशी कच्च्या खाद्यतेलाच्या मूळ आयात शुल्कात १० टक्क्यांची कपात केली आणि त्यावर पाणी फेरण्याचे काम केले.
कच्च्या खाद्यतेल आयातीवर मूळ आयात शुल्क २० टक्के होते. त्यावर कृषी पायाभूत सुविधा आणि सामाजिक कल्याण अधिभारासहीत २७.५ टक्के शुल्क लागू होते. पण केंद्र सरकारने शुक्रवारी (ता.३०) खाद्यतेलावरील मूळ आयात शुल्कात १० टक्क्यांची कपात केली. खाद्यतेल आयात शुल्क आता २७.५ टक्क्यांवरून १६.५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. कच्चे सोयाबीन तेल, कच्चे सूर्यफुल तेल आणि कच्चे पामतेल आयातीवरील शुल्कात कपात करण्यता आली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात पुरवठा जास्त असल्याने आधीच सोयाबीनचे भाव दबावात आहेत. या परिस्थितीत खाद्यतेलाचा सोयाबीनला आधार आवश्यक होता. पण सरकारने आयात शुल्कात कपात केल्याने तेलाचेही भाव कमी होणार आहे. त्यामुळे नव्या हंगामात सोयाबीनला ५ हजार ३२८ रुपये हमीभाव मिळण्याची शक्यताही धूसर होत आहे.
कारण आंतरराष्ट्रीय बाजारात पुरवठा असल्याने सोयापेंड आणि तेलाचे भाव कमी आहेत. त्यामुळे देशात आयात वाढेल. याचा दबाव सोयाबीनच्या दरावर येईल. शेतकरी अडचणीत येतीलच. पण सरकारचीही कोंडी होणार आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.