
मुख्य अन्नद्रव्यांसोबतच सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांच्या आवश्यकतेनुसार पुरविणे आवश्यक असते. विद्राव्य क्षमता उत्तम असल्यास कमी पाण्यातून जास्त खते परिणामकारकरीत्या देणे शक्य होते. त्यामुळे खते मुळांच्या कक्षेतच राहतात. पीक उत्पादनामध्ये अभ्यासपूर्वक खत व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. सध्याच्या काळात जमिनीची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे. यासाठी मुख्यत्वे मोकाट पाणी देण्याची पद्धत तसेच असंतुलित, अनियमित खतांचा वापर हे घटक कारणीभूत आहेत. जमिनीत मूलभूतपणे अपेक्षित असलेल्या अन्नद्रव्यांचे प्रमाण असंतुलित आहे. काही खतांचा अति प्रमाणात, अकार्यक्षमपणे वापर होतो. त्यातील घटक पिकाद्वारे अंशतः शोषून घेतल्यामुळे बऱ्याच अंशी न वापरले गेलेले घटक जमिनीत राहतात. त्यासोबतच मोकाट पाण्याच्या वापरामुळे खूप मोठ्या प्रमाणात क्षार पाण्यातून जमिनीमध्ये जातात. पाणी मुळांच्या कक्षेपलीकडे गेल्यामुळे त्याभागातील अनावश्यक क्षार मुळांच्या कक्षेत येतात. जमीन, पिकांचे क्षारांमुळे होणारे नुकसान सर्व प्रकारच्या क्षारांमुळे मुळांच्या कक्षेत विपरीत रासायनिक क्रिया होऊन पिकांसाठी अनावश्यक क्षार तयार होतात. परिणामी, जमिनीची क्षारता तसेच सामू वाढतो आणि जमिनीची सुपीकता कमी होते. यामुळे पिकांद्वारे जमिनीतून अन्नद्रव्य आवश्यकतेनुसार घेतली जात नाहीत. तसेच नियोजनाप्रमाणे अन्नद्रव्य देऊनसुद्धा पिकांकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नाही. परिणामी, उत्पादनावर परिणाम होतो. सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व मुख्य अन्नद्रव्यांसोबतच सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांच्या आवश्यकतेनुसार पुरविणे आवश्यक असते. सूक्ष्म अन्नद्रव्ये मुख्य अन्नद्रव्यांसोबत विशिष्ट रासायनिक सूत्रांद्वारे देणे क्रमप्राप्त असते, जेणेकरून ते अन्नद्रव्य पिकांद्वारे उत्तम रीतीने घेतली जाऊन पिकाची गुणवत्ता व उत्पादनात वाढ होते. अशा संतुलित व सूत्रबद्ध रासायनिक खतांचा वापर केल्याने खतातील अन्नद्रव्ये बऱ्याच अंशी पिकाद्वारे वापरले जातात. परिणामी, खतांची अति उच्च कार्यक्षमता प्राप्त होते. विद्राव्य क्षमता विद्राव्य क्षमता उत्तम असल्यास कमी पाण्यातून जास्त खते परिणामकारकरीत्या देणे शक्य होते. त्यामुळे खते मुळांच्या कक्षेतच राहतात. या विद्राव्य खतांचा सर्वात जास्त फायदा पिकांना मिळतो. विद्राव्य खतांमधील घटक
फवारणीद्वारे विद्राव्य खतांचा वापर
फायदे
फवारणीद्वारे दिल्या जाणाऱ्या खतांचे गुणधर्म
योग्य खतांची निवड राज्यातील बहुतांशी जमिनीचा सामू वाढत आहे आणि पीक उत्पादकता खालावलेली आहे. यावरील उपाय म्हणजे पिकांच्या शरीरक्रियाशास्रानुसार वैशिष्ट्यपूर्ण खतांची निवड. अशा वैशिष्ट्यपूर्ण खतामध्ये विशेष गुणधर्म असणे अपेक्षित आहे. सामू (पीएच)
- सुनील पाटील, ९८२२५९८६९८ - ललित सिंग भंडारी, ७०२३४१४३७० (ललित सिंग भंडारी हे फिनोझेन न्यूट्रीगेशन येथे जनरल मॅनेजर आणि सुनील पाटील हे फिनोलेक्स प्लासॉन इंडस्ट्रीज प्रा.लि.चे उपाध्यक्ष आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.