निखिल सोनोने, डॉ. उल्हास गायकवाडFarm Animal Diseases: जनावरांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांमध्ये परजीवी कीटक आणि परजीवीजन्य रोग हे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. परजीवींचा प्रादुर्भाव अनेकदा हळूहळू वाढत असल्याने सुरुवातीला त्याची तीव्रता लक्षात येत नाही; मात्र कालांतराने तो उत्पादनक्षमतेवर गंभीर परिणाम करतो..पशुधनापासून मिळणारे दूध, मांस, अंडी, लोकर, कातडी आणि शेणखत यांचा ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे. या सर्व पशुधनासाठी हिरव्या आणि पौष्टिक चाऱ्याची उपलब्धता करणारा हंगाम म्हणजे पावसाळा. कुरणे हिरवीगार होतात, चाऱ्याची उपलब्धता वाढते आणि जनावरांना नैसर्गिकरित्या चांगले पोषण मिळते. मात्र, पावसाळ्यातील वाढलेली आर्द्रता, सततचा ओलावा, साचलेले पाणी, चिखलयुक्त परिसर आणि मध्यम तापमान यांमुळे परजीवी कीटक, जंत आणि रोगकारक सूक्ष्मजिवांच्या वाढीसही वातावरण पोषक बनलेले असते. त्यामुळे या काळात गोचीड, उवा, पिसू, डास, माश्या यांसारख्या बाह्य परजीवींची संख्या झपाट्याने वाढते, तर गोलकृमी, यकृत कृमी आणि फुफ्फुस कृमी यांसारख्या अंतर्गत परजीवींचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो..Animal Heat Stress: जनावरांच्या उष्माघातावरील घरगुती, आयुर्वेदिक उपचार.परजीवी म्हणजे काय?दुसऱ्या सजीवाच्या शरीरावर किंवा शरीराच्या आत राहून त्याच्याकडून अन्न किंवा रक्त मिळवतानाच यजमानाला हानी पोहोचविणाऱ्या सजीवास परजीवी असे म्हणतात..परजीवींचे प्रकारबाह्य परजीवी ः हे जनावरांच्या शरीराच्या बाहेर राहतात. उदा. गोचीड, उवा, पिसू, माश्या, डास इ.अंतर्गत परजीवी ः हे जनावरांच्या शरीराच्या आत राहतात. उदा. गोल जंत (Roundworms), सपाट जंत (Tapeworms), यकृत कृमी (Liver flukes), फुफ्फुस कृमी (Lungworms), प्रोटोझोआ इ.पावसाळ्यात परजीवींचा.प्रादुर्भाव का वाढतो?पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता,मध्यम तापमान, सततचा ओलावा आणि अस्वच्छ वातावरण यामुळे परजीवींच्या वाढीस व पुनरुत्पादनास अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे गोचीड, उवा, पिसू, माश्या, डास तसेच विविध प्रकारचे अंतर्गत जंत यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. या काळात परजीवींचे जीवनचक्र कमी कालावधीत पूर्ण होत असल्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढते. पशुधनाला अधिक संसर्ग होण्याची शक्यता निर्माण होते..पावसाळ्यात परजीवी वाढण्याची प्रमुख कारणेवातावरणातील जास्त आर्द्रतेमुळे (७० -९० टक्के) परजीवींची अंडी व अळ्या कोरड्या पडत नाहीत आणि त्यांचे जगण्याचे प्रमाण वाढते.तापमान २०-३० अंश सेल्सिअस दरम्यान असणे, हे बहुतेक परजीवींच्या वाढीस, प्रजननास व जीवनचक्र पूर्णतेसाठी अनुकूल असते.गोठ्याभोवती साचलेल्या पाण्यात डास, माश्या व इतर कीटकांची पैदास वेगाने होते.परिसरातील चिखलामुळे गोचीड, पिसू व इतर बाह्य परजीवींना लपण्यासाठी आणि वाढण्यासाठी योग्य वातावरण मिळते..Livestock Care: उन्हाळ्यातील जनावरांचे आहार व्यवस्थापन.कुरणातील ओलसर गवतावर आढळणाऱ्या अंतर्गत जंतांच्या अळ्या चरताना जनावरांच्या पोटात जातात.गोठ्यातील शेण, मूत्र व सेंद्रिय काडीकचरा वेळेवर बाहेर न काढल्यास परजीवींची वाढ झपाट्याने होते.जनावरांची बसण्याची, झोपण्याची जागा सतत ओलसर राहते. ही बाब गोचीड, माइट्स व इतर परजीवींसाठी पोषक ठरते.दाट गवत व झुडपांमध्ये गोचीड मोठ्या प्रमाणात आढळतात. तिथेच ते जनावरांच्या संपर्कात येतात.पावसाळ्यातील ताण, पोषणातील कमतरता किंवा इतर रोगांमुळे जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत परजीवींचा संसर्ग अधिक गंभीर होतो..परजीवी वाढल्यामुळे होणारे परिणामपावसाळ्यात परजीवींचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर, उत्पादनक्षमतेवर आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर गंभीर परिणाम होतो. बाह्य व अंतर्गत परजीवी रक्त शोषतात, शरीरातील पोषक घटकांचा वापर करतात आणि विविध रोगांचा प्रसार करतात.रक्तक्षय ः गोचीड, उवा आणि हुकवर्म यांसारखे परजीवींनी सतत रक्त शोषल्यामुळे जनावरांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जनावरे अशक्त दिसतात, हिरड्या फिकट पडतात आणि काम करण्याची क्षमता कमी होते.वजन व वाढ कमी होणे ः अंतर्गत जंत आतड्यांतील पोषक घटक शोषून घेतात. त्यामुळे खाद्याचा योग्य उपयोग होत नाही, वाढ खुंटते, वजन कमी होते आणि लहान वयातील जनावरांचा विकास मंदावतो..दूध उत्पादनात घट ः परजीवींच्या संसर्गामुळे जनावरांची भूक कमी होते, शरीरावर ताण वाढतो आणि पोषक तत्त्वांचा अपुरा उपयोग होतो. परिणामी दूध उत्पादनात १०-३० टक्के किंवा त्याहून अधिक घट होऊ शकते.त्वचेचे विकार व खाज ः गोचीड, उवा, पिसू आणि माइट्समुळे त्वचेवर खाज, लालसरपणा, जखमा, केस गळणे आणि त्वचारोग होतात. त्यामुळे कातडीची गुणवत्ता देखील कमी होते.जुलाब व अशक्तपणा ः आतड्यांतील जंतांमुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊन जुलाब, निर्जलीकरण, भूक मंदावणे आणि तीव्र अशक्तपणा निर्माण होतो.प्रजनन कार्यक्षमतेत घट ः परजीवींच्या संसर्गामुळे मादी जनावरांमध्ये उशिरा माज येणे, गर्भधारणेचे प्रमाण कमी होणे, गर्भपाताचा धोका वाढणे तसेच नर जनावरांमध्ये प्रजनन क्षमता कमी होऊ शकते..रोगप्रतिकारशक्ती कमी होणे ः परजीवींच्या सततच्या प्रादुर्भावामुळे जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. त्यामुळे इतर जिवाणू, विषाणू व बुरशीजन्य रोगांचा संसर्ग सहज होतो.विविध संसर्गजन्य रोगांचा प्रसार ः गोचीड, डास आणि माश्या हे अनेक रोगांचे वाहक असतात. त्यांच्या माध्यमातून विविध रक्त परजीवी व संसर्गजन्य रोग एका जनावरापासून दुसऱ्या जनावरात पसरतात. उदा. गोचिडींमुळे थायलेरिओसिस, बाबेसिओसिस आणि अॅनाप्लाझ्मोसिस यांसारखे रक्तपरजीवीजन्य रोग पसरतात. डास आणि माश्या विविध विषाणूजन्य व जिवाणूजन्य रोगांचे प्रसारण करतात..आर्थिक नुकसान ः आजार वाढल्यामुळे त्यांच्या उपचार व औषधांवरील खर्च वाढतो.दीर्घकाळ आजारी राहिल्यास दूध, मांस, लोकर व उत्पादनात घट होते. जनावरांची बाजारातील किंमत कमी होते. गंभीर प्रादुर्भावामुळे मृत्यू होऊ शकतो. त्या स्थितीत मोठे आर्थिक नुकसान होते.जनावरांमध्ये येणाऱ्या विविध परजीवींचे एकात्मिक व पर्यावरणपूरक पद्धतीने नियंत्रण कसे करावे, याची माहिती पुढील लेखामध्ये घेऊ..पावसाळ्यात पशुपालकांनी घ्यावयाची विशेष काळजीवेळेवर लसीकरण ः पावसाळ्यात संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार वेळेवर लसीकरण केल्यास जनावरांचे रोगांपासून संरक्षण होते. संभाव्य आर्थिक नुकसान टाळता येते.जंतनिर्मूलन कार्यक्रम ः पावसाळ्यात अंतर्गत जंतांची वाढ जलद होते. नियोजनबद्ध जंतनिर्मूलन केल्याने जंतांचा प्रादुर्भाव कमी होतो, जनावरांची वाढ सुधारते आणि उत्पादनक्षमता वाढते.गोठा कोरडा ठेवावा ः गोठ्यात ओलावा व घाण साचू देऊ नये. स्वच्छ, कोरडा व हवेशीर गोठा ठेवल्यास गोचीड, माश्या, डास आणि इतर परजीवींची पैदास कमी होते..उपलब्धता स्वच्छ पाण्याची ः जनावरांना नेहमी स्वच्छ व दूषितमुक्त पाणी द्यावे. अशुद्ध पाण्यामुळे जंत व इतर संसर्गजन्य आजार होण्याचा धोका वाढतो.नवीन जनावरांचे विलगीकरण ः नवीन आणलेली जनावरे १५ ते ३० दिवस नियमित गोठ्यापासून वेगळी ठेवावीत. त्यांची आरोग्य तपासणी व जंतनिर्मूलन करावे. यामुळे संसर्ग इतर जनावरांमध्ये पसरण्यापासून प्रतिबंध होतो.पशुवैद्यकीय सल्ला ः जनावरांमध्ये भूक कमी होणे, ताप, अतिसार किंवा परजीवींची लक्षणे दिसल्यास त्वरित पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा. योग्य वेळी उपचार केल्यास गंभीर नुकसान टाळता येते..कुरणांचे व्यवस्थापन ः फिरत्या चराई पद्धतीचा अवलंब करून अतिचराई टाळावी. ओलसर व दूषित कुरणात चराई कमी केल्यास परजीवींचा संसर्ग कमी होतो.बाह्य परजीवींचे नियंत्रण ः गोचीड, उवा, पिसू, माश्या व डास यांच्या नियंत्रणासाठी नियमित स्प्रे, पोर-ऑन किंवा इतर शिफारस केलेल्या उपायांचा वापर करावा. यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहते आणि उत्पादनात घट होत नाही.- निखिल सोनोने ९९२१५१५१७९(आचार्य पदवी विद्यार्थी, पशुसंवर्धन व दुग्ध शास्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.