Weather Forecast Agrowon
हवामान

Monsoon Rain : पुढील ४ दिवस पावसाचा अंदाज; माॅन्सूनची आज देशातील आणखी काही भागात प्रगती

Weather News : हवामान विभागाने पुढील ४ दिवस राज्यभरात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News : माॅन्सूनने आज देशातील आणखी काही भागात प्रगती केली. तर राज्यातील अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने पुढील ४ दिवस राज्यभरात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. 

हवामान विभागाने आज अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात प्रगती केली. माॅन्सूनने महाराष्ट्र दोन दिवसांपूर्वीच व्यापला आहे. माॅन्सूनची सिमा आज मुंद्रा, उदयपूर, शिवपुरी, सिध्दी, चैबसा, हल्दीया, पाकूर, साहीबगंज आणि रक्सौल भागात होती. 

माॅन्सूनच्या प्रगतीसाठी हवामान पोषक आहे. त्यामुळे पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये माॅन्सून अरबी समुद्र, गुजरात, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि मध्य प्रदेशचा उर्वरित भाग व्यापेल. तसेच राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि हरियाच्या काही भागात दाखल होईल, असाही अंदाज हवामान विभगााने व्यक्त केला. 

हवामान विभागाने पुढील ४ दिवस राज्यातील विविध भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तर काही ठिकाणी जोरदार सरी पडतील, अशीही शक्यता व्यक्त केली.

विदर्भात पुढील ४ ही दिवस ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात तुलनेत पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका

Zero Tillage: मातीची सुपीकता वाढवणारी शून्य मशागत खर्चाची बचत कशी करते

Crop Damage Survey : चाकूर तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

bamboo Plantation : ​रत्नागिरीत १० हजार हेक्टरवर बांबू लागवड करणार

Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी

SCROLL FOR NEXT