Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

अमोल कुटे

Pune News : विदर्भात सूर्याचा प्रकोप सुरूच असल्याने उष्ण लाटेमुळे अंगाची लाही लाही होत आहे. ब्रह्मपूरी येथे उच्चांकी ४६.९ अंश तापमानाची नोंद झाली, तर पारा पंचेचाळीस अंशापार आहे. आज (ता. १) विदर्भात उष्ण लाटेचा इशारा कायम असून, कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. राज्याला मॉन्सूनचे वेध लागले असतानाच, आजपासून पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

तापमानाचा पारा पन्नाशीपार गेल्यानंतर देशात उन्हाचा चटका हळूहळू कमी होऊ लागला आहे. शुक्रवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांत राजस्थानातील गंगानगर येथे देशातील उच्चांकी ४८.३ अंश तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात उन्हाचा चटका अधिक तापदायक ठरत असून, राज्याच्या उर्वरित भागातही झळा कायम आहेत. ब्रह्मपूरीसह चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली, येथे ४५ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेल्याने उष्ण लाट कायम होती.

आज (ता. १) विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर येथे उष्ण लाटेचा, मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. आजपासून (ता. १) पूर्व विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणाच्या दक्षिणे कडील जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

शुक्रवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३६.५, धुळे ४२.०, जळगाव ४२.१, कोल्हापूर ३५.५, महाबळेश्वर २८.०, मालेगाव ४१.८, नाशिक ३६.१, निफाड ३७.०, सांगली ३६.४, सातारा ३५.३, सोलापूर ४०.०, सांताक्रूझ ३५.३, डहाणू ३६.३, रत्नागिरी ३५.०,

छत्रपती संभाजीनगर ४०.४, बीड ४१.५, नांदेड ४२.६, परभणी ४२.१, अकोला ४२.९, अमरावती ४४.२, भंडारा ४५.३, बुलढाणा ३९.०, ब्रह्मपूरी ४६.९, चंद्रपूर ४५.६, गडचिरोली ४५.०, गोंदिया ४४.८, नागपूर ४४.६, वर्धा ४५.०, वाशीम ४२.८, यवतमाळ ४३.५.

पश्चिम बंगाल, सिक्कीममध्ये मॉन्सूनची प्रगती

उन्हाचा तीव्र झळांनी होरपळ वाढली असतानाच, आनंद सरींसह मॉन्सूनचे केरळमध्ये दिमाखात आगमन झाले आहे. वेळे आधी दाखल झालेला मॉन्सून आणि चांगल्या पावसाचा अंदाज यामुळे असल्याने मॉन्सूनच्या आगमानकडे लक्ष लागले आहे.

बंगालच्या उपसागरावरील मॉन्सूनाची शाखा अधिक सक्रीय असल्याने शुक्रवारी (ता. ३१) संपूर्ण पूर्वोत्तर राज्यासह पश्चिम बंगालचा हिमालयाकडील भाग आणि सिक्कीम राज्यात मॉन्सूनने प्रगती केली आहे. दोन ते तीन दिवसांत अरबी समुद्रावरून मॉन्सूनचे आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी.

उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :

नागपूर, वर्धा, चंद्रपूर.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.

४४ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

ब्रह्मपूरी ४६.९, चंद्रपूर ४५.६, भंडारा ४५.३, वर्धा ४५, गडचिरोली ४५, गोंदिया ४४.८, नागपूर ४४.६, अमरावती ४४.२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT