Heat Wave  Agrowon
हवामान

Heat Wave Update : उत्तर भारतात उष्णतेचा कहर, ७२ तासांत १०० जण दगावले, हवामान खात्याकडून महाराष्ट्रातही उष्णतेच्या लाटेचा इशारा

Team Agrowon

Weather News : मॉन्सून लांबल्यामुळे देशभरातील अनेक राज्यात उष्णतेची लाट आल्याचे दिसून येत आहे. या उष्णलाटेचा सर्वात मोठा फटका उत्तर भारताला बसला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मागच्या ७२ तासांत तापमान वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

यूपीच्या बलियामध्ये वाढते तापमान आणि उष्माघातामुळे ३ दिवसांत ५४ जणांचा मृत्यू झाला, तर पाटण्यात मागच्या २४ तासांत उष्माघाताने ३५ जणांचा मृत्यू झाला.

याशिवाय बिहारच्या इतर जिल्ह्यांमध्येही ९ जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील विदर्भातही कडक उन्हाच्या झळा बसत आहेत. हवामान खात्याने महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांसाठी पुढील पाच दिवस तीव्र उष्णतेचा इशारा दिला आहे.

उष्माघात आणि उष्णतेच्या लाटेमुळे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गेल्या तीन दिवसांत जीव गमावणाऱ्यांची संख्या १०० च्या पुढे गेली आहे. यूपी-बिहारसह संपूर्ण उत्तर भारत सध्या उष्णतेच्या तडाख्यात आहे. हवामान खात्याने (IMD) उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचा इशारा जारी केला आहे.

हवामान खात्याने बिहारमधील बांका, जमुई, जहानाबाद, खगरिया, लखीसराय, नालंदा, नवादा, पटना, समस्तीपूर, शेखपुरा येथे पुढील २४ तासांत उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. आराहमध्ये उष्माघातामुळे आतापर्यंत १० ते १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

उष्माघातामुळे उलट्या, जुलाब, दम लागणे तसेच रक्तदाब अशा आजारांच्या रुग्णांची संख्या रुग्णालयांमध्ये वाढल्याची माहिती समोर आली आहे. यूपीलाही कडकडीत ऊन आणि उकाडा राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पाटण्यात २४ तासांत ३५ जणांचा मृत्यू, २४ जूनपर्यंत शाळा बंद

पाटण्यात मागच्या २४ तासांत उष्णतेमुळे ३५ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील शहरी शासकीय रुग्णालयांमध्ये १६ तर ग्रामीण रुग्णालयांमध्ये १९ रुग्णांचा मृत्यू झाला. याचबरोबर काही जिल्ह्यात उष्माघातामुळे ९ जणांना आपला जीव गमवावा लागला. बेगुसराय, सासाराम आणि नवादा येथे प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

याशिवाय भोजपूर आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. हवामान खात्याने (IMD) अद्यापही पुढचे २४ तास तीव्र उष्णतेचा इशारा दिला आहे. कडक उन्हामुळे शाळांच्या सुट्याही वाढवण्यात आल्या आहेत. तर पाटण्यात 24 जूनपर्यंत सर्व शाळा बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

बलिया येथे उष्माघाताने ५४ जणांचा मृत्यू झाला

उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात उष्णतेमुळे रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. १५, १६ आणि १७ या मागच्या तीन दिवसांत ताप, धाप लागणे आदी विविध कारणांमुळे सुमारे ५४ रुग्णांचा मृत्यू झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Serious Issues of Rape : लैंगिकतेचे शमन की दमन?

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

SCROLL FOR NEXT