Gopinath Munde accident insurance Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Farmer Accident Insurance Scheme : शेतकरी अपघात विमा योजनेतील लाभार्थी कुटुंबांना २९.९५ कोटी निधी मंजूर

राज्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवण्यात येते. या योजनेतून राज्यातील सर्व शेतकरी कुटुंबांना २ लाख रुपयांपर्यंत मदत देण्यात येते.

Team Agrowon

Farmer Scheme : शेतकरी अपघात विमा योजनेतून (Farmer Accident Insurance Scheme) अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांना २९.९५ कोटी निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला आहे. लवकरच लाभार्थी कुटुंबियांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत.

तसेच ७ एप्रिल ते २२ ऑगस्ट २०२२ पर्यंतच्या कालावधीला खंडित कालावधी म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे या कालावधीत प्राप्त १ हजार ५०८ प्रस्तावाला सरकारने मंजूरी दिली आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे.

राज्यात गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) शेतकरी अपघात विमा योजना राबवण्यात येते. या योजनेतून राज्यातील सर्व शेतकरी कुटुंबांना २ लाख रुपयांपर्यंत मदत देण्यात येते. त्यामध्ये शेतकरी, त्याची पत्नी, आई, मुलगा आणि अविवाहित मुलगी यांना ही मदत दिली जाते.

परंतु ही योजना राज्यात खासगी विमा कंपनीकडून राबवली जात होती. त्यामुळे अनेकदा विमा दावे निकाली काढण्यात दिरंगाई केली जायची. तसेच अनेक वेळा लाभ नाकाराला जायचा.

त्यामुळे राज्य सरकारने आता हे प्रस्ताव शासन नियुक्त समितीद्वारे तपासून मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संबंधित लाभार्थीच्या बँक खात्यावर थेट पैसे जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी सहसंचालक तथा मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT