संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

रत्नागिरीत साडेसहा हजार हेक्टरवर फळबाग लागवड

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी  ः राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात ६७५८ हेक्टरवर आंबा, काजू ,नारळ, सुपारी या नगदी पिकांची लागवड केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी दिल़ी. यामध्ये सर्वाधिक २४४६ हेक्टरवर काजूची लागवड करण्यात आली आह़े. यंदा चाकरमानी दाखल झाल्यामुळे या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात ‘मग्रारोहयो’च्या माध्यमातून विविध कामांची पूर्तता करताना फळबाग लागवडीला प्राधान्य देण्यात आले आह़े. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याने फळबाग लागवड योजनेमध्ये सर्वाधिक लक्ष गाठले आहे. यामध्ये काजू बरोबरच १९३८ हेक्टरवर आंबा, १५४६ हेक्टरवर नारळ तर १०२८ हेक्टर क्षेत्रावर सुपारीची लागवड करण्यात आली आहे. या योजनेमुळे आत्तापर्यंत अडीच कोटी ९३ लाखांचा निधी मजुरांवर खर्च करण्यात आला आहे. जिल्ह्यातील वातावरण फळबाग लागवडीसाठी अनुकूल असल्यामुळे या योजनेची अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे श्री. घोरपडे यांनी सांगितले. अल्प भूधारकांसह पाच हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनी देखील योजनेत सहभाग घेतला आहे. त्यामुळे ही योजना यशस्वी झाल्याचे श्री. घोरपडे यांनी सांगितले.  

निसर्ग चक्रीवादळामुळे आंबा, काजू, नारळ आदी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नव्याने फळबाग लागवडीसाठी सद्यःस्थितीत शेतकरी प्राधान्य देत आहेत. कृषी विभागाच्या ‘मग्रारोहयो’च्या माध्यमातून होत असलेली फळबाग लागवड शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. जिल्ह्यातील फळबाग लागवड क्षेत्र (हेक्टर) : काजू -२४४६, आंबा - १९३८, नारळ -    १५४६,सुपारी - १०२८.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT