Nagar News : नगर जिल्ह्यात अपघाती मृत्यू झालेल्या ४५० शेतकरी कुटुंबांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून दोन वर्षांत ११ कोटी १३ लाखांची मदत मिळाली आहे. त्यात आठ महिन्यांच्या खंडित कालावधीतील २५२ शेतकऱ्यांना ४ कोटी ९२ लाख आणि १८ अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. दोन वर्षांत एकूण ६३४ प्रस्ताव समितीकडे दाखल झाले होते.
शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या कारणाने अपघाती मृत्यू झाला अथवा कायमचे अपंगत्व आल्यावर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून दोन लाख रुपयांची मदत केली जाते. त्यासाठी शासनाकडून प्रत्येक शेतकऱ्याचा विमा उतरवला जात आहे. नगर जिल्ह्यात दोन वर्षांत एकूण ६३१ प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाले होते.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून संबंधित कंपनीकडे प्रस्ताव पाठवले. त्यातील ४४९ शेतकरी अपघात विमा योजनेतून, तर १८ अपंगत्वाचे प्रस्ताव विमा कंपनीने मंजूर केले आहेत. २३ ऑगस्ट २०२२ ते १८ एप्रिल २०२३ या आठ महिन्यांच्या कालावधीत विमा कंपनीचा करार संपलेला होता. त्यामुळे या खंडित कालावधीत विम्याचे प्रस्ताव रखडलेले होते. या कालावधीतील २८४ प्रस्ताव आले होते.
त्यातील २४० प्रस्ताव मंजूर करून ४ कोटी ९२ लाख रुपयांचा विमा दिला आहे. दोन वर्षांत १८ शेतकऱ्यांना अपंगत्व आले. त्यांनाही विमा योजनेतून मदत देण्यात आली आहे. यंदापेक्षा मागील वर्षी अधिक प्रस्तावाला मंजुरी मिळालेली आहे. यंदा (२०२३-२४) मध्ये १३० कुटुंबांच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन २ कोटी ५९ रुपयांचा विमा योजनेतून दिल्याचे सांगण्यात आले.
मंजूर प्रस्ताव (कंसात दाखल प्रस्ताव)
नगर ३६ (३६)
पारनेर ४४ (५२)
पाथर्डी ७५ (७९)
श्रीरामपूर १६ (१९)
शेवगाव २९ (३७)
नेवासा ४८ (५१)
राहुरी ३१ (३६)
कर्जत ५४ (६१)
जामखेड २५ (३६)
श्रीगोंदा ४१ (४८)
संगमनेर ७८ (६८)
कोपरगाव १९ (१९)
अकोले ४१ (४५)
राहाता ३२ (३७)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.