संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

अमरावती जिल्ह्यातील तेरा तालुक्‍यांत भूजल पातळी वाढली

टीम अॅग्रोवन

अमरावती  ः जिल्ह्यात या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने १३ तालुक्‍यांतील भूजल स्तरात गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत पहिल्यांदाच वाढ नोंदविण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात १५० निरीक्षण विहिरींच्या पातळीवरून हा निष्कर्ष पुढे आला आहे. 

जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ८१४.४९ मिमी आहे. यंदा ८९०.१९ मिमी पाऊस झाला. ही टक्‍केवारी १०७.६६ आहे. यात पाच तालुके पिछाडीवर असले तरी या तालुक्‍यांना मॉन्सूनोत्तर, परतीचा तसेच अवकाळी पावसाने साथ दिलेली आहे. जिल्ह्यातील ७५ टक्‍के भूभाग बेसॉल्ट खडकाने व २५ टक्‍के पूर्णा नदीच्या गाळाने व्यापला आहे. या गाळाची १० ते १२ मीटरपर्यंतची खोली भूजल पुनर्भरणास योग्य असल्याचा निष्कर्ष भूजल सर्वेक्षण विभागाने नोंदविला आहे.

भातकुली, अमरावती व दर्यापूर तालुक्‍यात कमी पाऊस झाल्याने भूजलात घट झाली नसली तरी वाढदेखील इतर तालुक्‍यांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे या तालुक्‍यांमध्ये तिसऱ्या टप्प्यात पाणीटंचाई उद्‍भवण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र भुजल विकास व व्यवस्थापन २००९ मधील आठ (१) च्या तरतुदीनुसार पिण्याचे पाण्याचे स्रोत संरक्षित करण्याच्या दृष्टीने खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे जिल्ह्यातील १५० निरीक्षण विहिरींच्या स्थिर पातळीच्या नोंदीची पाच वर्षांच्या सरासरी पातळीशी तुलना करण्यात आली. 

यापूर्वी ऑक्‍टोबर महिन्यात अशाच पद्धतीने नोंद घेण्यात आल्या होत्या. यामध्ये अमरावती, भातकुली, नांदगाव खंडेश्‍वर, तिवसा व वरुड तालुक्‍यातील भूजल तीन मीटरपर्यंत खाली आल्याचे निरीक्षण नोंदविले गेले. त्या आधारे जिल्ह्यात मार्चपर्यंत १६ व एप्रिलनंतर २३ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. १४ पैकी केवळ अंजनगावसूर्जी तालुक्‍यातच भूजल पातळी उणे ०.२० मीटर आहे.   

तालुकानिहाय भूजल पातळी (मीटर) : अमरावती ः ०.८७, भातकुली ः ०.४६, नांदगाव ः  २.३४, चांदूर रेल्वे ः १.६०, तिवसा ः १.१०, मोर्शी ः २.२७, वरुड ः २.५४, अचलपूर ः १.३०, चांदूरबाजार ः २.७०, दर्यापूर ः ०.५५, धारणी ः २.५२, चिखलदरा ः १.५९, धामणगाव ः १.७९.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT