पुलाअभावी शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे
पुलाअभावी शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे 
मुख्य बातम्या

पवनारमधील शेती कसण्यासाठी करावा लागतोय जीवघेणा संघर्ष

टीम अॅग्रोवन

वर्धा  ः धाम नदीच्या दुसऱ्या बाजूस शेती असलेल्या शेतकऱ्यांची फरपट पूल झाल्यावर थांबेल अशी अपेक्षा होती. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून पुलाचे काम ठप्प पडल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा नावेतून जीवघेणा प्रवास करण्याची वेळ आली आहे. 

पवनार हा परिसर आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पावन झालेला. विनोबा भावेंनी भूदान चळवळ राबवून भूमिहिनांना जमीनदार केले. परंतु त्याच विनोबा भावेंचे वास्तव्य असलेल्या परिसरातच शेतकऱ्यांची होरपळ होत आहे. पवनार लगतच्या धाम नदीच्या दुसऱ्या बाजूस शेकडो शेतकऱ्यांची जमीन आहे. परंतु नदी पार करण्यासाठी पुलाची व्यवस्था नसल्याने नावेचा आधार घेत शेतकऱ्यांना शेतापर्यंत जावे लागत होते. शासन, प्रशासनस्तरावर गेली अनेक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर या नदीवर पुलाला मंजुरी मिळाली. सहा कोटी २७ लाख ७० हजार रुपयांचा निधी या पुलाकरिता मंजूर झाला.

दीड वर्षांपूर्वी पुलाच्या प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली. परंतु नदीपात्रात तीन खांब उभे करण्यापलीकडे हे काम पुढे सरकलेच नाही. सुरुवातीलाच नियमांना डावलून हे काम सुरू करण्यात आले होते. नदीलगत लोकवस्ती असताना मोठ्या प्रमाणात हेवी ब्लास्ट करून नदीपात्रातील खडक फोडण्यात आले. या ब्लास्ट दरम्यान नदीतील मोठा खडक फुटून त्याचे तुकडे परिसरातील नागरिकांच्या घरावर कोसळले होते. त्या वेळी मोठा अनर्थ टळला. अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करीत ग्रामस्थांची समजूत घातली. त्यामुळे या वादावर पडदा पडत पुलाचे काम सुरू झाले होते. आता मात्र हे काम पूर्णपणे ठप्प असल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा नावेतून जीवघेणा प्रवास करण्याची वेळ आली आहे.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT