पुणे ः ‘ॲग्राेवन स्मार्ट अचिव्हर्स’ याेजनेची साेडत बुधवारी (ता. २७) पृथ्वी ॲकॅडमीचे संचालक विश्‍वनाथ पाटील आणि ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांच्या उपस्थितीत झाली.
पुणे ः ‘ॲग्राेवन स्मार्ट अचिव्हर्स’ याेजनेची साेडत बुधवारी (ता. २७) पृथ्वी ॲकॅडमीचे संचालक विश्‍वनाथ पाटील आणि ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांच्या उपस्थितीत झाली.  
मुख्य बातम्या

सुधीर बोरकर ठरले लॅपटॉपचे मानकरी

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या ‘अॅग्रोवन स्मार्ट अचिव्हर्स स्पर्धे’ला उदंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेच्या निकालासाठी काढलेल्या सोडतीत भंडारा जिल्ह्यातील सुधीर हरिश्चंद्र बोरकर यांना पहिले बक्षीस मिळाले असून, ते लॅपटॉपचे मानकरी ठरले आहेत.  ‘अॅग्रोवन’ आयोजित आणि पृथ्वी अॅकॅडमी प्रायोजित या स्पर्धेत राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्या उज्ज्वल भवितव्याचा शोध घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पाठविलेल्या दोन हजार पात्र प्रवेशिकांची सोडत ‘अॅग्रोवन’च्या पुणे कार्यालयात काढण्यात आली. ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे, पृथ्वी अॅकॅडमीचे संचालक विश्वनाथ पाटील, ‘अॅग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण, ‘अॅग्रोवन’चे मुख्य व्यवस्थापक (वितरण) चंद्रशेखर जोशी यांच्या उपस्थितीत १३ लाख रुपयांच्या बक्षिसांची सोडत काढण्यात आली. स्पर्धेत १६१२ बक्षिसे वाटली जात असून, प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.  या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी ‘अॅग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांमधील कूपन्स भरून प्रवेशिकांच्या माध्यमातून पाठविले होते. ‘ॲग्रोवन स्मार्ट अचिव्हर्स’ सोडत निकाल जाहीर होताच लॅपटॉपचे पहिले बक्षीस पटकवणाऱ्या सुधीर बोरकर (सेंदुरवाफा, ता. साकोली, जि. भंडारा) यांना दूरध्वनीवरून माहिती देण्यात आली. श्री. बोरकर हे ग्रंथपाल असून, स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. 

दुसरे बक्षीस टॅबलेटस्‌चे होते. एकूण पाच बक्षीसे, मानकरी असे..     योगेश सीताराम जरारे, हट्टी, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद,     संजीवनी सा. शेळके, नेकनूर, ता. जि. बीड     तुकाराम अमृता कांबळे, कागल, जि. कोल्हापूर,     आकाश सुरेश साठवणे, मुंडीकोटा, ता. तिरोडा, जि. गोंदिया     राजकिरण दलपतसिंग राजपूत, आढे, ता. शिरपूर, जि. धुळे

तिसरे बक्षीस स्मार्टफोन, एकूण सहा बक्षीसे, मानकरी असे...       शिवानी श्रीकृष्ण ढोरे, नांदुरा, जि. बुलडाणा     मंगेश विक्रम खेडकर, औरंगाबाद     कुंदन नंदकिशोर चौधरी, पिंपरूड, ता. यावल, जि. जळगाव     राघोबा बाबन म्हेत्री, मुगाव, ता. नायगाव, जि. नांदेड     विवेक शिवाजी चौधरी, आर्वी, ता. जि. धुळे     शीतल प्रदीप गांगुर्डे, वडनेर भैरव, ता. चांदवड, जि. नाशिक हे ठरले आहेत. 

चौथे बक्षीस म्हणून १०० जणांना एक हजार रुपये किमतीचे गिफ्ट मिळणार आहेत. पाचवे बक्षीस मिळालेल्या ५०० विद्यार्थ्यांना पृथ्वी प्रकाशनची एमपीएससी, यूपीएससीची एक हजार रुपये किमतीची पुस्तके मिळणार आहेत. याशिवाय एक हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५०० रुपयांची पृथ्वी प्रकाशनची ''यशाची परिक्रमा'' मासिकाची वार्षिक वर्गणी दिली जाणार आहे. स्पर्धेतील उर्वरित १६०० बक्षीसपात्र विद्यार्थ्यांची नावे १० जुलैनंतर ‘अॅग्रोवन’मधून क्रमशः प्रसिद्ध केली जाणार आहेत. या सोडत सोहळ्याचे सूत्रसंचालन ‘अॅग्रोवन’चे वरिष्ठ व्यवस्थापक (वितरण) संभाजी घोरपडे यांनी तर आभार वरिष्ठ व्यवस्थापक (जाहिरात) विकास खैरनार यांनी मानले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT