आंबा
आंबा 
मुख्य बातम्या

आंबा निर्यात यंदा २५ टक्क्यांनी वाढणार

टीम अॅग्रोवन

मुंबई ः देशात यंदा अवकाळी पाऊस व गारपिटीने आंबा बागांना फटका बसला. परिणामी आंबा उत्पादन घटले आहे. परंतु फळाची गुणवत्ता चांगली असल्याने यंदा देशातून आंबा निर्यात २५ टक्क्यांनी वाढणार आहे, असे कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात विकास मंडळाचे अध्यक्ष डी. के. सिंग यांनी सांगितले. ‘‘यंदा देशात आंबा उत्पादनाला फटका बसला आहे. मात्र फळांची गुणवत्ता चांगली असल्याने निर्यात वाढणार आहे. यंदा ७० हजार टन निर्यात होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी ५५ हजार टन निर्यात झाली होती’’, असे श्री. सिंग यांनी सांगितले. महाराष्ट्रात नोव्हेंबर ते एप्रिलदरम्यान बहराच्या काळात पाऊस, गारपीट, उष्णतेची लाट आणि तापमान बदल यामुळे फळधारणेवर परिणाम झाला. त्यामुळे आंबा उत्पादन घटले आहे. तसेच डिसेंबर महिन्यात आलेल्या ओखी वादळामुळे पश्चिम आणि दक्षिणेतील किनारी भागात आंबा बागांना फटका बसला होता. तसेच उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्येही आंबा उत्पादन घटले आहे. उत्पादनातील घट आणि निर्यात वाढणार असल्याने ग्राहकांना मात्र आंब्याची चव महाग पडणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT