Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Elections 2024 : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली असून काटे की टक्कर राज्यातील काही मतदार संघात पाहायला मिळणार आहे. सध्या अख्या राज्याचे लक्ष कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघाकडे लागले आहे.
Lok Sabha Elections
Lok Sabha ElectionsAgrowon

Pune News : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज मंगळवारी (ता. ७) सकाळी ७.०० वाजेपासून सुरू झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.६४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक चर्चेचे आणि हायहोल्टेज मतदार संघ म्हणून कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघाची चर्चा झाली. आता प्रत्यक्षात मतदानाला सुरूवात झाली असून मतदार मतदानासाठी सकाळी ७ वाजल्यापासूनच घरा बाहेर पडला आहे. सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर -८.०४ टक्के तर हातकणंगले - ७.५५ टक्के मतदानाची नोंद झाली असून महाराष्ट्रात महाराष्ट्र - ६.६४% टक्के मतदान झाले आहे.

राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे यंदा लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदान कमी झाले आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान देखील सकाळी मिळालेल्या टक्केवारीवरून कमी झाले आहे. जे संपूर्ण देशाच्या तुलनेत सर्वात कमी मतदान आहे. यामुळे मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून लोकशाहीच्या या सोहळ्यात सहभाग घ्यावा असं आवाहन केलं जात आहे.

शाहू महाराज आणि राजू शेट्टी

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शाहू महाराज आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजू शेट्टी यांनीही मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शाहू महाराज यांनी मतदान केंद्रात जाऊन मतदारांचा उत्साह वाढवला. तर त्यांनी पाहून मतदारांनी त्यांचे स्वागत केले. तसेच शेट्टी यांनी त्यांच्या कुटुंबीयांबरोबर मतदान केले मतदान करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या मातोश्रींचा आशीर्वाद घेतला.

महाराष्ट्रात कुठे-किती मतदान?

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे -

हातकणंगले - ७.५५ टक्के

कोल्हापूर -८.०४ टक्के

माढा -४.९९ टक्के

लातूर - ७.९१ टक्के

सांगली - ५.८१ टक्के

बारामती - ५.७७ टक्के

उस्मानाबाद -५.७९ टक्के

रायगड -६.८४ टक्के

रत्नागिरी -सिंधुदूर्ग-८.१७ टक्के

सातारा -७.०० टक्के

सोलापूर -५.९२ टक्के

देशातील ११ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यातील पश्चिम बंगालमध्ये पहिल्या दोन तासांमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. याठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटनाही पहायला मिळत आहेत. मात्र तरीही मोठ्या संख्येने लोक बाहेर पडून मतदान करत आहेत.

देशात कुठे-किती मतदान?

सकाळी नऊ वाजेपर्यंतची देशातील मतदानाची आकडेवारी समोर आली आहे.

आसाम - १०.१२%

बिहार - १०.४१%

छत्तीसगड - १३.२४%

दादरा-नगर हवेली आणि दमण दीव - १०.१३%

गोवा - १३.०२%

गुजरात - ९.८७%

कर्नाटक - ९.४५%

मध्य प्रदेश - १४.४३%

महाराष्ट्र - ६.६४%

उत्तर प्रदेश - १२.९४%

पश्चिम बंगाल - १५.८५%

कोल्हापूर मशिन झाले स्लो

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील मार्केट यार्ड येथील एका मतदान केंद्रान सकाळीच ईव्हीएम मशिन स्लो झाले. यामुळे मतदान रेंगाळले होते. एका व्यक्तीच्या मतदान प्रक्रियेस तब्बल १० ते १५ मिनिटांचा कालावधी लागत होता. यानंतर येथे निवडणूक प्रशासनाने ईव्हीएम मध्ये सुधारणा केल्यावर मतदान प्रक्रियेला वेग आला.

अनेक ठिकाणी उन्हात मतदान

कोल्हापूर शहर आणि परिसरात अनेक मतदान केंद्र ही प्राथमिक शाळांसह इतर ठिकाणी आहेत. सध्या उन्हाचा जोर वाढला असतानाही प्रशासनाकडून उन्हापासून बचावासाठी काही सोय केल्याचे दिसत नाही. अनेक मतदान केंद्राबाहेर मतदारांना उन्हातच थांबावे लागत आहे. यामुळे सकाळच्या सत्रातच मतदानाचा टक्का कमी झाल्याचे दिसत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com