आम्ही हरलो नाही...आम्हाला येथून बाहेर पडायचेय, म्हणून उपोषण सोडले
आम्ही हरलो नाही...आम्हाला येथून बाहेर पडायचेय, म्हणून उपोषण सोडले 
मुख्य बातम्या

आम्ही हरलो नाही...आम्हाला येथून बाहेर पडायचेय, म्हणून उपोषण सोडले !

टीम अॅग्रोवन

नगर  ः शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुणतांबा (जि. नगर) येथे सहा दिवसांपासून कृषिकन्यांनी सुरू केलेले ‘अन्नत्याग अांदोलन’ नगर येथील जिल्हा रुग्णालयात मागे घेतले. पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते लिंबू-पाणी घेऊन उपोषण सोडले. ‘‘आम्ही हरलो नाही...आम्हाला येथून बाहेर पडायचेय, त्यासाठी पोटात अन्न गेल्या शिवाय आम्ही येथून बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे उपोषण सोडावे लागत आहे,’’ अशी हतबलता या वेळी उपोषणकर्त्या कृषिकन्यांनी व्यक्त केली. दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उपोषण कर्त्या मुली चर्चा करणार असल्याचे खोतकर यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्यावर्षी देशभर गाजलेल्या शेतकरी संपाची सुरवात करणाऱ्या पुणतांबा येथील निकिता धनंजय जाधव, पूनम राजेंद्र जाधव, शुभांगी संजय जाधव या कृषी कन्यांनी दिलेल्या अाश्‍वासनाची पूर्तता करावी, यासाठी ४ फेब्रुवारीपासून अन्नत्याग अांदोलन सुरू केले होते. पहिले चार दिवस प्रशासनाने अांदोलनाची कोणाही दखल घेतली नाही. चौथ्या दिवशी पालकमंत्री राम शिंदे यांनी पुणतांबा येथे भेट देऊन उपोषण सोडण्याची केलेली विनंती असफल ठरली.  नगर जिल्हा रुग्णालयातील video..

गुरुवारी शुभांगी जाधव हिची प्रकृती खालावली, मात्र उपचार घेण्याला नकार दिला होता. शुक्रवारी गावकऱ्यांचा विरोध मोडून शुभांगीला उपचारासाठी नगर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र शनिवारी पहाटे पोलिसांनी गावकरी आणि उपोषणकर्त्या कृषी कन्यांचा विरोध मोडून निकिता धनंजय जाधव, पूनम राजेंद्र जाधव यांना बळजबरीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

त्यांच्या भोवती पोलिसांनी कडे केल्यामुळे त्यांना कोणाशीही बोलू दिले जात नव्हते. सकाळी पावणे बारा वाजता राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जिल्हा रुग्णालयात मुलींसोबत अतिदक्षता विभागात तासभर चर्चा केल्यानंतर मुलींना बाहेर आणले. त्यानंतर उपोषण सोडत असल्याचे त्या मुलींनी सांगितले. मात्र त्यांच्या चेहऱ्यावर तणाव आणि हतबलता स्पष्ट दिसत होती. खोतकर यांनीही अनेक प्रश्नावर बोलणे टाळले. पोलिसांची दडपशाही उपोषण करणाऱ्या मुलींना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यापासून त्या मुली नजरकैदेत असल्या सारख्या होत्या. त्यांच्या भोवती पोलिसांचे कडे होते. पालकांसह अन्य कोणालाही त्यांच्याशी बोलू दिले जात नव्हते. शिवाय त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाची पोलिस नोंद घेत होते. जिल्हा रुग्णालयातील जागोजागी लोकांना अडवले जात होते. त्यामुळे अन्य रुग्णांची आणि त्यांचे नातेवाइकांचेही हाल झाले. आम्ही हरलो नाही... ‘‘पोलिस आणि प्रशासन आमच्यावर नजर ठेवून आहेत. आम्हाला येथे रात्री जबरदस्तीने आणल्यावर कोणालाही आमच्याशी बोलू देत नव्हते. गावात व अन्य ठिकाणी काय चाललेय हे काहीच कळायला तयार नव्हते. प्रशासन आणि पोलिस दबाव आणत होते. त्यामुळे आम्हाला येथून बाहेर पडणे गरजेचे आहे आणि त्यासाठीच आम्ही उपोषण सोडत आहेत. मात्र सरकारने धोका दिला तर आम्ही तिघी नव्हे तर शेकडो मुलींना सोबत घेऊन पुन्हा उपोषण करू. आम्ही हारलो नाही, हरणारही नाही. प्रशासनाने व पोलिसांनी जबरदस्तीने उपोषण सोडायला लावले,’’ असे मुलींनी सांगितले नसले तरी त्यांच्या बोलण्यातील हतबलता स्पष्ट दिसत होती.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT