kalwa
kalwa 
मुख्य बातम्या

ताकारी’चे सहा तालुक्यांना पाणी 

टीम अॅग्रोवन

सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या दोन आवर्तनांतून या लाभ क्षेत्रातील सहा तालुक्याला पाणी दिले. दोन आवर्तनातून सुमारे ३.१० टीएमसी पाणी उचलले असून तिसरे आवर्तन चार ते पाच दिवसांत सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सुत्रांनी दिली.  ताकारी प्रकल्पात वाळवा, कडेगाव, खानापूर, पलूस, तासगाव आणि मिरज या सहा तालुक्यांचा समावेश असून २७ हजार ४३० हेक्टर क्षेत्र आहे. या योजनेतून ९.३४ टीएमसी पाणी उचलण्याची परवानगी आहे. यंदा ताकारीचे पहिले आवर्तन २७ डिसेंबरला सुरु करण्यात आले. या आवर्तनासाठी कृष्णा नदीतून १.३ टीएमसी पाणी उचलले होते. दुसरे आवर्तन ७ मार्च मध्ये सुरु करण्यात असून यासाठी १.७ पाण्याचा वापर झाला आहे. सहा तालुक्यांत १४४ किलोमीटर पर्यंत पाणी पोहोचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  यंदा चांगला पाऊस पडला असल्याने कोयना धरणात पाणीसाठा अधिक शिल्लक आहे. त्यामुळे आवर्तन करण्यास कोणतीही अडचण आली नाही. योजनेची दोन आवर्तने झाली असून ३.१० टीएमसी पाणी उचलले असून तिसरे आवर्तन लवकरच सुरु केले जाणार आहे. तिसऱ्या आवर्तनासाठी २.४0 टीएमसी पाण्याचा वापर होईल. म्हणजे ताकारी योजनेतून ५.५0 टीएमसी पाण्याचा वापर होणार आहे. अर्थात, कोयना प्रकल्पातून ९.४३ पाणी उचलण्याची परवानगी आहे. त्यामुळे पाणी कमी लागल्याने ३.३८ टीएमसी पाण्याचा उपसा कमी झाला आहे. 

ताकारी उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील मिरज तालुका शेवटचा आहे. या भागातील गतवर्षी मुख्य कालव्याचे काम पूर्ण झाल्याने या भागात पाणी दाखल झाले आहे. त्यामुळे द्राक्ष पिकाला शाश्वत पाण्याची सोय झाली आहे. मुळात दुष्काळी भागात दोन आवर्तने मिळाल्याने या भागातील पाण्याची पातळीत देखील वाढ झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT