संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठ्याचा निर्णय

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी  ः केंद्र शासनाच्या ‘हर घर नल से जल’ या योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक घरात पाणी पुरविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. जिल्ह्यातील ८४५ ग्रामपंचायतीअंतर्गत ३ लाख ४७ हजार ९०० ग्राहक असून, आतापर्यंत विविध योजनांमधून १ लाख ७६ हजार ग्राहकांच्या घरांत नळाद्वारे पाणी पुरवण्यात आले आहे. उर्वरित २ लाख २३ हजार ग्राहकांच्या घरातं मार्च २०२४ पर्यंत नळाद्वारे पाणी मिळणार आहे. त्यासाठी कोट्यवधींचा निधी केंद्र शासन देणार आहे. 

‘हर घर नल से जल’ ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. काही दिवसांपूर्वी राज्याच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यामध्ये केंद्र शासनाची ही योजना प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, त्यादृष्टीने नियोजन करून आराखडे तयार करण्यात यावेत अशा सूचना दिल्या गेल्या. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने पावले उचलली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे पंधराशेहून अधिक गावे आहेत. ८ प्रादेशिक नळपाणी योजना असून, त्याद्वारे पाणीपुरवठा होतो.  

अजूनही धनगरवाड्यांसह अनेक वाड्यांना उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. कोकणातील भौगोलिक क्षेत्राचा विचार करता त्यांना पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. त्यासाठी केंद्राची ही योजना निश्‍चितच उपयुक्त ठरणार आहे. त्या त्या गावांचा आराखडा तयार करून बंधारे बांधणे, नवीन विहिरी खोदणे, पाऊस पाणी संकलन टाकीच्या माध्यमातूनही पाणी योजनांची अंमलबजावणी यामध्ये केली जाणार आहे.

प्रत्येक व्यक्तीला ४० लिटर पाणी हा निकष बदलून तो ५५ लिटर केला आहे. वाढीव लागणारे पाणी लक्षात घेऊनच नियोजन केले जाणार आहे. कोकणासाठी दरडोई खर्च ३ हजार रुपये प्रति व्यक्ती असा निश्‍चित केला होता. तो वाढवून किमान ५ हजार रुपये करावा, अशी मागणी कोकणातील नागरिकांनी केली आहे. वीजपुरवठ्याअभावी योजना अपूर्ण राहत असतील तर त्या ठिकाणी सौरपंपांचाही उपयोग केला जाईल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT