नवी दिल्ली ः साखरेच्या किमती येत्या काळात ४२ ते ४५ रुपये किलोपर्यंत पोचल्यास दर नियंत्रणासाठी आणखी साखर आयात करण्यास परवानगी दिली जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी (ता. २७) केले.
येथे आयोजित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या बैठकीत गडकरी म्हणाले, की देशभरात सध्या विविध सण, उत्सव सुरू आहेत. आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वूमीवर ७ सप्टेंबरला केंद्र सरकारने तीन लाख टन कच्च्या साखरेच्या आयातील परवानगी दिली होती.
सद्यःस्थितीत साखरेचे दर ४० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहेत. तसेच लवकरच गाळप हंगामही सुरू होणार आहे. त्यामुळे आयातीची फार काही गरज आहे असे वाटत नाही. मात्र साखरेचे दर ४२ ते ४५ रुपयांपर्यंत पोचल्यास आणखी साखर आयातीस परवानगी मिळणे शक्य आहे.
साखर आयातील परवानगी देण्याची शिफारस करणाऱ्या समितीमध्ये केंद्रीय मंत्री गडकरीसुद्धा होते. त्यामुळे त्यांनी केलेल्या या वक्तव्यास साखर उद्योगाच्या दृष्टीने महत्त्व आहे.