‘उजनी’तून भीमेतील विसर्ग कायम
‘उजनी’तून भीमेतील विसर्ग कायम 
मुख्य बातम्या

‘उजनी’तून भीमेतील विसर्ग कायम

टीम अॅग्रोवन

सोलापूर : पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाने काहीशी उसंत घेतल्याने उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात घट झाली आहे. परिणामी, पुढे उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग शनिवारी (ता. २८) कमी करण्यात आला आहे. शनिवारी उजनीतून भीमा नदीत केवळ ११ हजार ६०० क्‍युसेक एवढाच विसर्ग सुरू होता.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून उजनी धरणात दौंडकडून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग ४० हजार क्‍युसेकच्याही पुढे होता. पण, शुक्रवारपासून पाऊस थांबला, तसा विसर्गही घटविण्यात आला आहे. त्यामुळे पुढे भीमा नदीतील विसर्गही कमी करण्यात आला. शुक्रवारी २१ हजार ६०० क्‍युसेकचा विसर्ग शनिवारी ११ हजार ६०० क्‍युसेकवर म्हणजे दहा हजार क्‍युसेकने विसर्ग कमी करण्यात आला. 

गेल्या पाच-सहा दिवसांपासून सातत्याने पाणी सोडण्यात येत असल्याने पंढरपुरत पूरस्थिती निर्माण झाली होती. पण, आता विसर्ग घटविण्यात आल्याने संभाव्य पूरपरिस्थिती टळली आहेच. पण, लोकांची धावाधावही थांबली आहे.

दरम्यान, उजनीकडे येणारा दौंडचा विसर्गही शनिवारी आणखी काही प्रमाणात कमी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नदीतील विसर्गही कमी होईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, उजनी धरणातील पाणीपातळी अद्यापही ११०. ३६ टक्‍क्‍यांवर स्थिर आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT