शेतकऱ्यांशी संवाद साधताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे
शेतकऱ्यांशी संवाद साधताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे 
मुख्य बातम्या

राज्यात शेतकरी मदत केंद्रे उभारणार : उध्दव ठाकरे

टीम अॅग्रोवन

कडेगाव, जि. सांगली  : अतिवृष्टी व मॉन्सूनोत्तर पावसाने सर्वत्र पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकवार नुकसानभरपाई मिळायला हवी ती आम्ही मिळवून देऊ. त्यासाठी राज्यभरात शेतकरी मदत केंद्रे उभारली जातील. शेतकऱ्यांनी धीर सोडू नये; खचून जाऊ नये. आम्ही ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहोत, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. १५) नेवरी (ता. कडेगाव) येथील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला तसेच मदतीचेही आश्वासन दिले. या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार विश्वजीत कदम, मोहन कदम, अनिल बाबर, मिलिंद नार्वेकर, संजय विभूते उपस्थित होते.

श्री. ठाकरे म्हणाले, की सांगली जिल्ह्यात पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. संकटसमयी शेतकऱ्यांना मदत मिळणे गरजेचे आहे. त्यासाठीच माझी धडपड सुरु आहे. परंतु, शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आलो आहे. शेतकऱ्यांना पिकवार नुकसानीची भरपाई मिळाली पाहिजे. त्यासाठी आमचा प्रयत्न आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea Brand : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT