Traffic ban destroy silk cell in Kolhapur
Traffic ban destroy silk cell in Kolhapur 
मुख्य बातम्या

कोल्हापुरात वाहतुक बंदीचा रेशीम कोषाला फटका

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : वाहतूक बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे तयार रेशीम कोष मार्केटमध्ये पाठवता येत नाहीत. त्यामुळे कोष खराब होऊन नुकसान होत आहे. तर, दुसरीकडे नवीन उत्पादनासाठी अंडी पुंज मिळत नसल्यामुळे लागवड केलेली तुतीची बाग तोडून टाकायची वेळ आली आहे. या दुहेरी संकटात रेशीम उत्पादक शेतकरी सापडला आहे. 

जिल्ह्यात जवळपास ५०० हून अधिक शेतकरी रेशीम शेती करतात. अवघ्या २५ दिवसांत अंडी, अळी व कोष निर्माण होण्याची प्रकिया घडत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला डोळ्यात तेल घालून काम करावे लागते. अळीच्या वेगवेगळ्या स्टेजप्रमाणे तुतीच्या पानाची खाद्य म्हणून जोपासना करावी लागते. वर्षभरात एक शेतकरी जवळपास आठ ते नऊ पिके घेतो. त्याप्रमाणे त्याचे नियोजन असते. 

तयार रेशीम कोष वेळेत मार्केटमध्ये पोहचावे लागतात. अन्यथा, कोषातील अळीचे फुलपाखरात रूपांतर होते. त्यावेळी फुलपाखरू कोष तोडून बाहेर पडतो. त्यामुळे साहजिकच रेशीम धागे तुटतात. हे धागे कोणी खरेदी करीत नाहीत. असे तयार कोष अनेक शेतकऱ्यांनी तयार केले आहेत. पण, ते मार्केटमध्ये पाठवायची सोय नसल्यामुळे कोष खराब होत आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT