सातारा ः जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम संपला असून १५ साखर कारखान्यांनी ८५ लाख ६० हजार ६६९ टन उसाचे गाळप करत एक कोटी २४ लाख चार हजार ५२५ क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. अजिंक्यतारा कारखान्याचा अपवाद वगळता इतर कोणत्याही कारखान्याने एफआरपीची रक्कम अदा केलेली नाही.
जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम संपला असून सलग दुसऱ्या वर्षी कारखान्यांनी साखरनिर्मितीत कोटीची उड्डाणे घेतली आहेत. साखर हंगामाच्या सुरवातीस शेतकरी संघटना व कारखानादार यांच्यात बैठक घेऊन एकरकमी एफआरपीबाबत तोडगा काढण्यात आला होता. दरम्यान साखरेचे दर कमी झाल्याने एफआरपी रकमेच्या ८०-२० या फॉर्म्युलाप्रमाणे दर देण्यात आला होता. हंगाम संपल्यानंतर एकमेव अजिंक्यतारा कारखान्याने उर्वरित एफआरपी रक्कम दिली आहे. इतर कारखाने शिल्लक एफआरपी कधी देणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी ८५ लाख ६० हजार ६६९ टन उसाचे गाळप करीत एक कोटी २४ लाख चार हजार ५२५ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. गाळप, गाळप कालावधी व साखरनिर्मितीत सह्याद्री कारखान्याने आघाडी घेतली आहे. सह्याद्री कारखान्याचा शनिवारी (ता. २७) गाळप हंगाम संपला. या कारखान्याने १३ लाख १६ हजार ९६३ टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे १६ लाख ४५ हजार ८८० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. या कारखान्यांचा साखर उत्पादनाचा अंतिम अहवाल झाला नसल्याने साखरनिर्मितीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
साखर उताऱ्यात रयत-अथणी या सहकारी व जयवंत शुगर या खासगी कारखान्याने आघाडी घेतली असून या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १२.९२ टक्के आहे. सर्वात कमी साखर उतारा स्वराज्य इंडिया अॅग्रो या कारखान्याचा ९.७० टक्के आहे. गाळप हंगामाच्या अंतिम टप्प्यात जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांच्या साखर उताऱ्यात सुधारणा झाली असून सरासरी ११.९६ टक्के साखर उतारा मिळला.
गाळप हंगामाची वैशिष्ट्ये
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.