पपई बागा वाचविण्यासाठी धडपड
पपई बागा वाचविण्यासाठी धडपड 
मुख्य बातम्या

पपई बागा वाचविण्यासाठी धडपड

टीम अॅग्रोवन

हिंगोली : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीमुळे पिण्यासाठी, तसेच सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता अत्यंत कमी झाली आहे. या परिस्थितीत पपई बागा वाचविण्यासाठी सातेफळ (ता. वसमत) येथील शेतक-यांचे प्रयत्न सुरू आहेत. अपुरे पाणी, तसेच उन्हामुळे पाने होरपळत आहेत. फळे परिपक्वतेच्या अवस्थेत पाणी कमी पडल्यामुळे उत्पादनात मोठी घट येणार असून, शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने उत्पादन खर्च निघणेदेखील मुश्कील झाले आहे.

काही महिन्यांपूर्वी सिंचनासाठी खात्रीचे पाणी उपलब्ध असलेल्या सातेफळ येथील १० ते १२ शेतकऱ्यांनी यंदा १० ते १५ एकरवर पपईची लागवड केली आहे. दुष्काळी स्थितीमुळे उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करून ठिंबक सिंचन पद्धतीने पपई बागा जोपासल्या. परंतु, गेल्या दोन महिन्यांपासून सर्वच शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी कमी पडू लागले आहे. त्यात गेल्या १५  ते २० दिवसांपासून या भागातील तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. उन्ह, वेगाच्या वा-यामुळे भिजविलेली जमीन झटकन कोरडी पडत आहे. ओलावा नष्ट झालेल्या जमिनीला भेगा पडल्या आहेत.  पपईच्या झाडाची पाने उन्हात होरपळत आहेत.

फळे परिपक्वेच्या अवस्थेत आहेत. परंतु, पाणी कमी पडत असल्याने फळाचा आकार, तसेच वजन वाढणे अशक्य झाले आहे. लहान आकाराची फळे झाडावर कोमेजत आहेत. शेतकरी बागा वाचविण्यासाठी नवीन कूपनलिका, छोटे शेततळे खोदत सिंचनाची व्यवस्था करीत आहेत. झाडे जिवंत ठेवण्यासाठी शेतकरी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. परंतु पाणी कमी पडत असल्याने पपई  बागांची होरपळ सुरूच आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT