वादळी वाऱ्याने भोपळा, कारल्याचे मांडव जमीनदोस्त
वादळी वाऱ्याने भोपळा, कारल्याचे मांडव जमीनदोस्त 
मुख्य बातम्या

वादळी वाऱ्याने भोपळा, कारल्याचे मांडव जमीनदोस्त

टीम अॅग्रोवन

नाशिक : जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, गुरुवारी (ता. ११) नाशिक तालुक्याच्या पश्चिम भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. पावसाचा सर्वाधिक भोपळा, कारले या फटका फळभाज्यांना फटका बसला आहे. 

तालुक्याच्या पश्चिम भागात गंगापूर धरणाच्या बॅक वॉटर परिसरात गणेशगाव, पिंपळगाव गरुडेश्वर या गावांमध्ये अनेक शेतकऱ्यांनी एप्रिल- मे महिन्यात भोपळा, कारले पिकांची लागवड केली आहे. सद्यःस्थितीत अनेक शेतकऱ्यांचा शेतीमाल काढणीला सुरवातही झाली. नाशिक, कल्याण व मुंबई बाजारांत व्यापाऱ्यांकडून सध्या चांगली मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना समाधानकारक दोन पैसे मिळायला सुरवात झाली. मात्र, पावसासोबत झालेल्या वादळामध्ये अनेक शेतकऱ्यांचे भोपळा व कारल्याचे मांडव जमीनदोस्त झाले. त्यामुळे मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे या हंगामात केलेले भाजीपाल्याचे नियोजन व शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे. केलेला हा खर्च वाया जाणार आहे.

भांडवल, पाणी व वीजपुरवठा यांची अडचण असताना भोपळ्याची लागवड केली. यंदा शेतीमालाला चांगला भाव मिळाला नाही. त्यात पदरमोड करून अर्धा भोपळ्याची लागवड केली. मुंबईच्या व्यापाऱ्यांची मागणी असल्याने दोन पैसे व्हायला सुरवात झाली होती. मात्र, सगळे कष्ट आता मातीमोल झाले. शासनाने पंचनामे करून मदत घ्यावी.  - झावरू बाळा कापसे, शेतकरी, गणेशगाव, ता. जि. नाशिक  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

Storm Hits Meghalaya's : मेघालयात १३ गावांमध्ये घरांचे नुकसान, ४०० हून अधिक लोक बाधित

SCROLL FOR NEXT