पाणीटंचाई
पाणीटंचाई 
मुख्य बातम्या

सातारा जिल्ह्यात ४२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

टीम अॅग्रोवन
सातारा  : पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी लावूनही जिल्ह्यातील अनेक भागातील पाणीटंचाई कमी झालेली नाही. जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात टॅंकरच्या संख्येत १३ ने वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यात ४२ टॅंकरद्वारे ४९ गावे १२६ वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा सुरू आहे.
 
जिल्ह्यात पाणीटंचाई वाढत आहे. मागील पंधरवड्यात टॅंकरची संख्या २९ होती ती आता ४२ वर गेली आहे. सध्या जिल्ह्यात ४२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये माण व जावली तालुक्‍याला पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा सोसाव्या लागत आहेत. या तालुक्‍यात १० टॅंकरद्वारे १४ गावे आणि ८० वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे. जावली तालुक्‍यातील नऊ गावे व दहा वाड्यावस्त्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 
 
खटाव तालुक्‍यातील सहा टॅंकरने आठ गावे २८ वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे. कोरेगाव तालुक्‍यातील सात गावांना सहा टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. खंडाळा तालुक्‍यात एका गावाला एका टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
 
वाई तालुक्‍यातील दोन गावे, एका वाडीवस्तीला दोन टॅंकरद्वारे, पाटण तालुक्‍यातील एक गाव चार वाड्यावस्त्यांना दोन टॅंकरद्वारे, तर महाबळेश्वर तालुक्‍यातील सात गावे व तीन वाड्यावस्त्यांना तीन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
 
संरक्षित पाण्यासाठी जिल्ह्यातील ३५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये माणमधील ४, खटावमधील १, कोरेगावमधील ४, फलटणमधील ५, वाईमधील ७, जावलीमधील सात, महाबळेश्वरमधील ७ विहिरींचा समावेश आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT