गंगटोक, सिक्कीम ः सिक्कीमची संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे राज्य म्हणून घोषणा झाल्यानंतर २०१६-१७ या वर्षात या राज्यात ८० हजार टन विविध भाजापाल्याचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यात अाले अाहे.
गेल्या वर्षी १८ जानेवारी २०१६ रोजी सिक्कीमची संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे राज्य म्हणून घोषणा करण्यात अाली होती. रासायनिक खते, कीटनाशकांच्या वापरावर निर्बंध, पर्यावरणपूरक शेतीवर भर, शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शेतमालाचे ब्रॅडिंग केल्याने सिक्कीममधील सेंद्रिय शेती फायदेशीर ठरली अाहे. येथील शेतीत भात, मका, लसूण, हळद, बकव्हीट ही प्रमुख पिके घेतली जातात.
‘‘गेल्या वर्षी सेंद्रिय पद्धतीने ८० हजार टन भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यात अाले. सेंद्रिय शेतीप्रती बांधिलकी जपत हे उत्पादन घेतले अाहे,’’ असे राज्याच्या फलोत्पादन अाणि नगदी पिके विकास खात्याचे सचिव खोर्लो भूतिया यांनी सांगितले. भाजीपाल्याचे उत्पादन हे रसायनकमुक्त घेतले जात अाहे. एकूण ७६,३९२ हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली प्रमाणित केले अाहे. त्यापैकी १४ हजार हेक्टरवर सेंद्रिय पद्धतीने शेतपिकांची लागवड केली अाहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
राज्य भाजीपाला उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी १०० मेट्रिक टन उत्पादन कमी पडत अाहे. त्यासाठी टप्प्प्याटप्प्याने सेंद्रिय शेती अभियान राबविले जात असून, हळूहळू प्रमाणित क्षेत्र लागवडीखाली अाणले जाणार अाहे. पहिल्या टप्प्यात १४ हजार हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली अाणण्यात अाले अाहे. २०१८ पर्यंत निश्चित केलेल्या क्षेत्रावर सेंद्रिय शेती, पीक काढणी पश्चात व्यवस्थापन, प्रक्रिया, ब्रॅडिंग, विपणन अादी गोष्टी पूर्ण केल्या जाणार अाहे, असेही भूतिया यांनी सांगितले.
फळे, मसाला पिकांचे उत्पादन
सिक्कीममध्ये १०० मेट्रिक टन चेरी पेपर्स, १०० क्विंटल किवी फळाचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यात अाले अाहे. त्याशिवाय वेलदोडे, अाले, हळद, बकव्हीट अादी पिके प्रायोगिक तत्त्वावर घेतली जात अाहेत.
२४ हजार शेतकरी करतात सेंद्रिय शेती
सिक्कीमधील २८ शेतकरी संघटनांमधील २४ हजार शेतकरी सेंद्रिय पद्धतीने विविध पिकांचे उत्पादन घेत अाहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालास जास्तीत जास्त दर मिळावा यासाठी पणन यंत्रणा विकसित करण्याची गरज अाहे. त्यासाठी शेतकरी सहकारी सोसायटी स्थापन करण्यात अाली अाहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची रक्कम ई-व्हाऊचर पद्धतीने दिली जाणार अाहे, असेही नगदी पिके विकास खात्याचे सचिव भूतिया म्हणाले.