खरीप मळण्यांना पावसाचा फटका
खरीप मळण्यांना पावसाचा फटका 
मुख्य बातम्या

खरीप मळण्यांना पावसाचा फटका

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात दररोज पाऊस सुरू असल्याने याचा फटका खरिपाच्या मळण्यांना बसत आहे. दिवसभर कडक ऊन असल्याने शेतकरी खरीप पिकांची कापणी करून मळणी करण्याच्या तयारीत असताना चार वाजल्यापासून जोरदार पाऊस सुरू होत असल्याने कापलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. 

पिकांची प्रत ढासळत असल्याने उत्पादनातही घट येत असल्याचे चित्र शिवारात आहे. चांगली आणि सुपीक शेती असणाऱ्या या गावांमध्ये पुरात न सापडताही अतिवृष्टीमुळे शेतात साचलेल्या पाणीच भुईमूग, सोयाबीन आणि भात पिकाला मारक ठरले आहे. कांही ठिकाणी सोयाबीन मळणीचे काम सुरू आहे. 

अतिवृष्टीमुळे गारठून गेलेल्या सोयाबीनच्या शेंगा परिपक्व झाल्या नाहीत. सतत सुरू असणाऱ्या अतिवृष्टीमुळे वातावरणात उब मिळाली नसल्याने शेंगाची वाढही खुंटली. शेताच्या सऱ्यांमध्ये सतत पाणी राहून चिखल झाल्यामुळे भुईमूगाच्या शेगांची संख्याही खूप कमी झाली आहे. भुईमुगाच्या एका-एका जाळीमध्ये ३० ते ३५ शेंगा असतात. या वेळी मात्र या शेंगामध्ये घट होऊन एका जाळीला केवळ १० ते १२ आणि त्याची जाडीही कमी झाली आहे.

पुरातून सावरलेल्या शेतकऱ्यांना आता चार महिन्यांपूर्वी पेरून उगवलेल्या पिकांची चिंता लागली आहे. जे पिके चांगली आहेत. पुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे काहीही झाले नाही, असे समजून पंचनामे केले नव्हते, आता याच पिकामधील उत्पादन निघाताना शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.

यावर्षी जिल्ह्यात उसासह भुईमूग, सोयाबीन आणि भाताच्या पिकातही मोठी घट झाली आहे. सायंकाळी एक दोन तास जोरदार पाऊस होतो. यामुळे सकाळी शेताचे तळे झालेले असते. या परिस्थितीत काढणीला आलेले भात, सोयाबीन पीक काढायचे कसे या चिंतेत आहेत. पाणी साचत असल्याने पीक काढणी नाइलाजास्तव पुढे ढकलावी लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

SCROLL FOR NEXT