ग्राहक विक्री केंद्र
ग्राहक विक्री केंद्र  
मुख्य बातम्या

मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय शेतमाल विक्री केंद्र

टीम अॅग्रोवन

नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही अनेक शेतकरी सेंद्रिय शेतमालाचे उत्पादन घेतात. या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वसुंधरा सेंद्रिय शेतकरी उत्पादक गटाची स्थापना केली. उत्पादित केलेल्या शेतमालाची मुंबईत थेट ग्राहकांपर्यंत विक्री करण्याचा निर्णय घेऊन अंधेरी येथे डी. एन. नगरमध्ये कायमस्वरूपी थेट शेतकरी ते ग्राहक विक्री केंद्र सुरू केले आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा ) नाशिक यांच्या वतीने २०१७-१७ पासून ३८ गटांवर जिल्ह्यात परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत काम सुरू आहे. या योजनेंतर्गत सहभागी ३८ शेतकरी गटांचे हमी पद्धतीने प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील १९०० एकर क्षेत्रावर १३४९ शेतकरी सेंद्रिय उत्पादन घेतात. सेंद्रिय शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध असून शेतकरी आता स्वतःची बाजारपेठ व विक्रीव्यवस्था उभी करू लागले आहेत.  मुंबईत नुकतेच या केंद्राचे उद्‍घाटन नाशिक आत्माचे प्रकल्प उपसंचालक कैलास शिरसाठ, यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सिन्नर तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, पराज ऑरगॅनिक चे डॉ. विनोद जैन, डॉ. दीपिका जैन, वसुंधरा शेतकरी गटाचे भागवत बलक, गट तंत्रज्ञान व्यवस्थापक सागर खैरनार, नाशिक जिल्ह्यातील  सेंद्रिय शेतीतील प्रगतिशील शेतकरी यशवंत गावंडे, माणिकराव कासार, यांसह विविध शेतकरी व गटातील सहभागी शेतकरी उपस्थित होते. मुंबईतील या भागातील अनेक ग्राहकांनी या केंद्राला भेटी देत मालाला पसंदी दिली. ऑनलाइन व घरपोच विक्री पद्धत सेंद्रिय भाजीपाला, विदेश भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्य, खाद्यतेल, गावरान तूप व मसाले विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. हा शेतमाल ऑनलाइन व घरपोच विक्री पद्धतीने शेतमाल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea Brand : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT