farmers agitation
farmers agitation  
मुख्य बातम्या

कृषी कायद्यांवर ‘तारीख पे तारीख’ 

टीम अॅग्रोवन

नवी दिल्ली ः शेतकरी नेते कृषी कायदे रद्द करण्याच्या आपल्या मागणीवर ठाम होते, तर सरकारच्या वतीने शेतकरी नेत्यांनी ताठर भूमिका सोडून कायद्यांत आवश्‍यक सुधारणा सुचविण्यास सांगितले. दोन्ही बाजूंनी आपली भूमिका रेटल्याने शेतकरी नेते आणि सरकारमधील चर्चेची नववी फेरी शुक्रवारी (ता. १५) कोणत्याही तोडग्याविना पार पडली. चर्चेची पुढील फेरी आता मंगळवारी (ता. १९) होणार आहे. 

शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी चर्चेच्या आठ फेऱ्या संपूनही तोडगा निघाला नाही. सर्वोच्च न्यायालयाने तोडग्यासाठी समिती स्थापन केल्यानंतरही सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चा सरूच आहे. शुक्रवारी तब्बल पाच तास बैठक चालली. बैठकीच्या सुरुवातीलाच कृषिमंत्री तोमर यांनी शेतकरी नेत्यांना लवचिक भूमिका घेण्याचे आवाहन केले. 

कृषिमंत्री तोमर म्हणाले, की आम्ही शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. तरी तुम्ही सरकार प्रतिष्ठेचा विषय बनवत असल्याचे म्हणत आहेत. तुम्हाला असे वाटत नाह का की तुम्ही ताठर भूमिका सोडून कृषी कायदे रद्द करण्याची लावलेली एकाच मागणीवर अडून बसू नये, असे शेतकरी नेते बलजितसिंग बाली म्हणाले. 

प्रतिक्रिया शेतकरी नेते आपल्या मागणीवर ठाम होते. आम्ही सरकारकडे नवीन तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली. परंतु सरकारने असे करण्या नकार देत सुधारणा सुचविण्यास सांगितले. आम्ही आता १९ जानेवारीला दुपारी १२ वाजता पुन्हा बैठक घेण्याचे ठरविले आहे.  - जोगिंदरसिंग उग्रहान, शेतकरी नेते 

सरकारने आम्हाला सांगितले, की शेतकरी आंदोलनावर कोर्टात नाही तर चर्चेतून तोडगा निघेल. सर्वांचे याबाबतीत एकमत आहे. त्यामुळे आंदोलनाच्या तिढ्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.  - राकेश टिकैत, शेतकरी नेते  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT