कपाशीनंतर आता गव्हावर खोड अळीचा प्रादुर्भाव
कपाशीनंतर आता गव्हावर खोड अळीचा प्रादुर्भाव 
मुख्य बातम्या

कपाशीनंतर आता गव्हावर खोड अळीचा प्रादुर्भाव

सकाळ वृत्तसेवा

घनसावंगी, जि. जालना : खरिपात कापसावर आलेल्या बोंड अळीने शेतकऱ्यांचे पुरते नुकसान झाले. आता रब्बीत गव्हाच्या पिकांवर खोड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. उपाययोजना करूनही ही अळी आटोक्‍यात येत नसल्याने शेतकरी पुरता वैतागला आहे.

घनसावंगी तालुक्‍यात बोंड अळीग्रस्त कपाशीचे पीक शेतकऱ्यांनी पंचनाम्यानंतर काढून टाकले. पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतकऱ्यांनी यंदा गव्हाची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली आहे. मात्र, या गव्हावर खोड अळीचा प्रादुर्भाव झाला. गव्हाच्या पिकाची पाने पिवळी पडत आहेत.

यावर शेतकऱ्यांनी फवारण्याही केल्या, तरी पाने पिवळी होण्याचे थांबत नाहीत. त्यामुळे आता गव्हावर संकट येत असल्याने शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांवर गव्हाचे पीक उपटून टाकण्याची वेळ आली आहे. तालुक्‍यातील राजेगाव परिसरासह अनेक भागात हे चित्र आहे. त्यामुळे कृषी विभागाने या क्षेत्रांची पाहणी करून उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.

खोडकिडीच्या नियंत्रणासाठी... कृषी विभागाचे कृषी सहायक संजय लोंढे यांनी सांगितले, की प्रादुर्भाव झालेली झाडे उपटून नष्ट करावीत, खोडकिडीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा चिलोनीस या मित्रकिटकांची अंडी दीड लाख प्रति हेक्‍टर प्रमाणात उगवणीनंतर दोन आठवड्यांनी सुरवात करून दर दहा दिवसांच्या अंतराने तीन ते चार वेळ सोडावीत. खोडकिडीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन १० ईसी ११ मिलीलिटर पाणी किंवा डायक्‍लोरव्हास ७६ ईसी १२ मिलीलिटर या प्रमाणे फवारणी करावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT