म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू
म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू 
मुख्य बातम्या

म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू

टीम अॅग्रोवन

सांगली ः ऐन उन्हाळ्यात म्हैसाळ उपसा सिंचन योजना तांत्रिक बंद ठेवली होती. या दरम्यान, मुख्य कालव्याची गळती पूर्णपणे काढून झाली आहे. पाणीटंचाई लक्षात घेऊन म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या योजनेतील पहिल्या टप्प्यावरील पाच पंप सुरू करण्यात आले आहेत. सध्याचे आवर्तन किमान जुलैपर्यंत सुरू राहील, अशी माहिती पाबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

म्हैसाळ उपास सिंचन योजना ऑक्टोबरमध्ये आवर्तन सुरू केले होते. पाच महिन्यांत सहा टप्प्यातील ६५ पंपाद्वारे जतपर्यंत पाणी सोडण्यात आले होते. सुमारे १४४ दिवस सलग आवर्तन सुरू होते. देखभाल व दुरुस्तीअभावी तांत्रिक बिघाडामुळे म्हैसाळ योजना २ मार्चमध्ये बंद करण्यात आली. दरम्यान, पंपाची दुरुस्ती आणि आरग, बेडग, सलगरे या मुख्य कालव्यांची गळती बंद करण्यासाठी अस्तरीकरणाच्या कामासाठी तीन आठवड्यांहून अधिक ही योजना बंद करण्यात आली होती. गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. पाटबंधारे विभागाकडून मुख्य कालव्यांची गळती बंद करण्यात आली आहे. 

सध्या मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, जत या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही योजना सुरू करण्याची मागणीदेखील करू लागले होते. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून पंप दुरुस्ती आणि गळतीचे काम झाल्याने ही योजना सुरू केली आहे. म्हैसाळ उपसा योजनेतील टप्प्यातील हळूहळू पंप सुरू केले जातील. योजना सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कृष्णा नदीत म्हैसाळ धरणाजवळ ५२५ मीटर पाणीपातळी आहे. म्हैसाळच्या उपशासाठी हा पाणीसाठा पुरेसा आहे. उन्हाळ्यासाठी कोयनेतून पाणी घेण्याचे नियोजन होते; मात्र सध्या ताकारी आणि टेंभू योजनांसाठी कोयनेतून पाणीउपसा सुरू आहे; त्यामुळे म्हैसाळसाठी चांदोली धरणातून पाणी मागवण्यात आले आहे. सध्याचे आवर्तन किमान जुलैपर्यंत सुरू राहील. शेतकऱ्यांनी १९ टक्‍क्‍यांच्या हिशेबाने पाणीपट्टी भरण्यास पुढे येण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रत्येक कालवे व वितरिकेतून पाणी मोजून दिले जाणार आहे.

१६४ तलाव देणार भरून या लाभ क्षेत्रात सुमारे १६४ तलाव आहेत. वाढत्या पाणीटंचाईमुळे या योजनेच्या लाभ क्षेत्रातील हे तलाव कोरडे पडले आहेत. आता ही योजना सुरू झाल्याने तीन तालुक्यांतील शेतीसह पिण्यासाठी तलाव भरून देण्याचे नियोजन पाटबंधारे विभाग करत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT