राज्यात कमाल तापमानात आणखी वाढ
राज्यात कमाल तापमानात आणखी वाढ  
मुख्य बातम्या

राज्यात कमाल तापमानात आणखी वाढ

टीम अॅग्रोवन

पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणातील उकाड्यात वाढ झाली आहे. यामुळे कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. येत्या चार ते पाच दिवसांत उन्हाचा चटका आणखी वाढणार असून, उन्हाच्या झळा आणखी तीव्र होणार आहेत. शुक्रवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत विदर्भातील अकोला येथे ४४.० अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.   गुरुवारी व शुक्रवारी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. त्यामुळे कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन ते चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेल लक्षणीय वाढ झाली. विदर्भात काही भागात किंचित वाढ झाली. गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शुक्रवारी (ता. ५) दिवसभर उकाडा जाणवत होता. मात्र, उन्हाचा चटका हा नेहमीप्रमाणेच कायम होता.  विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र व कर्नाटकच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने गुरुवारी (ता. ४) अचानक सकाळपासून हवामानात बदल झाला होता. मात्र, शुक्रवारी या कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले आहे. त्यामुळे उन्हाचा चटका चांगलाच वाढू लागला आहे. विदर्भातील बहुतांशी सर्वच शहरांचा पारा चाळीस अंशांच्या वर गेला आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली आहे. मराठवाड्यातही औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी या शहरांचा पारा ४२ ते ४२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता. मध्य महाराष्ट्र व खान्देशातही उन्हाचा पारा ४३ अंशांपर्यंत गेला आहे. कोकणातही कमाल तापमान ३२ ते ३४ अंश सेलिअसच्या दरम्यान होता.    शुक्रवारी (ता. ५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.५, नगर ४२.४, जळगाव ४३.०, कोल्हापूर ३७.१, महाबळेश्‍वर ३३.७, मालेगाव ४२.६, नाशिक ४०.४, धुळे ४२.२, सांगली ४०.४, सातारा ४०.३, सोलापूर ४१.३, सांताक्रुझ ३२.३, अलिबाग ३४.०, रत्नागिरी ३२.०, डहाणू  ३३.६, औरंगाबाद ४१.४, बीड ४१.८, नांदेड ४२.५, परभणी ४२.०, अकोला ४४.० (२६.०), अमरावती ४३.८ (२०.८), बुलडाणा ४१.२ (२४.८), ब्रह्मपुरी ४१.७ (२३.४), चंद्रपूर (२७.२), गडचिरोली ४०.२ (२३.०), गोंदिया ४०.० (२१.४), नागपूर ४१.२ (२६.५), वर्धा ४३.० (२७.६), वाशिम ४०.६ (२४.०), यवतमाळ ४२.० (२५.४).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT