संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

शेतकरी आत्महत्या, दुष्काळाच्या मुद्द्यावर सरकारला घेरणार ः मल्लिकार्जुन खर्गे

टीम अॅग्रोवन

मुंबई ः भाजप-शिवसेना सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राची अधोगती झाली असून, सर्वच समाजघटकांमध्ये सरकारविरोधात तीव्र संताप आहे. दुष्काळ, पूरस्थिती हाताळण्यात सरकारला आलेले अपयश, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, आर्थिक मंदी या मुद्द्यांवर काँग्रेस पक्ष सरकारला घेरणार आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. 

विधानसभा निवडणुकीसाठी टिळक भवन येथे उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अद्ययावत वॉररूमचे उद्‍घाटन रविवारी श्री. खर्गे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व वॉररूमचे प्रमुख अविनाश पांडे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव महाराष्ट्राचे सहप्रभारी चेला वामशी रेड्डी, संपतकुमार, बी. एम. संदीप, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत, वॉररूमचे समन्वयक अभिजित सपकाळ, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, रमेश शेट्टी आदी उपस्थित होते.

या वेळी श्री. खर्गे म्हणाले, की अविनाश पांडे यांच्या नेतृत्वाखाली अद्ययावत वॉररूमच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन आणि समन्वय साधला जाणार आहे. या वॉररूमच्या माध्यमातून स्टार प्रचारकांच्या सभांचा समन्वय, सोशल मीडियावरील प्रचाराचे नियोजन केले जाणार आहे. उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि कायदेशीर मदत व सल्ला दिला जाणार आहे.

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसची वॉर रूम सज्ज आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आघाडीची पूर्ण तयारी झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT