Kerala_assembly_1.jpg
Kerala_assembly_1.jpg 
मुख्य बातम्या

केरळमध्ये कृषी कायद्यांना डच्चू; भाजप आमदाराचेही समर्थन 

अजय कुमार ः सकाळ न्यूज नेटवर्क 

केरळ :केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधातील विधेयक केरळ विधानसभेत गुरुवारी एकमताने मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे विधानसभेतील भारतीय जनता पक्षाचे एकमेव आमदार असलेले ओ राजगोपाल यांनीही या विधेयकाला पाठिंबा दिला.  भाजपच्या या एकमेव आमदारानेही या विधेयकाला समर्थन दिले. कृषी कायद्यांविरोधात पंजाब-हरियानातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर महिनाभरापासून आंदोलन करीत असताना हे कायदे राज्यात लागू करण्याविरोधातील विधेयक केरळ सरकारने मंजूर केले. यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन गुरूवारी (ता.31) बोलाविण्यात आले होते. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सभागृहात विधेयक मांडले. सत्तारूढ डाव्या पक्षांची आघाडी (एलडीएफ), काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) यांचा या विधेयकाला पाठिंबा होताच. भाजपच्या एकमेव आमदार ओ. राजगोपाल यांनी विधेयकाला समर्थन दिल्याने सभागृहातील उपस्थित सर्वांच्या भुवया उंचावल्या. याबाबत ते म्हणाले की, हे विधेयक सर्वसहमतीने मंजूर झाले आहे. विधेयकातील काही मुद्दांबाबत मतभेद असल्याने त्याबाबत माझे विचार सभागृहात मांडले आहेत. माझा या विधोयकाला पूर्ण पाठिंबा असून सभागृहातील सार्वमताला माझा पाठिंबा आहे. ही लोकशाहीची भावना असून केंद्र सरकारने हे तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले. 

उद्योजकांच्या भल्यासाठी कायदे  विजयन म्हणाले की, कृषी कायद्यांविरोधातील दिल्लीतील आंदोलन यापुढेही सुरू राहिले तर केरळमध्ये त्याचे परिणाम दिसून येतील. अन्य राज्यांमधून केरळला अन्नधान्याच्या पुरवठा झाला नाही तर राज्याला उपाशी राहावे लागेल. केद्राचे हे कायदे उद्योजकांच्या भल्‍यासाठी आहेत. हे कायदे अंमलात आणल्यास शेतकऱ्यांची सौदेबाजीची शक्ती कमी होईल आणि त्याचा फायदा उद्योग क्षेत्राला होईल, अशी टीका त्यांनी केली. देश एका कठीण परिस्थितून जात आहे आणि आंदोलक शेतकऱ्यांच्याबरोबर उभे राहणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे, असेही विजयन म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT