काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम मिळाली
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम मिळाली 
मुख्य बातम्या

काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम मिळाली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे देण्यास पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका अडत्याकडून टाळाटाळ केली जात होती. अखेर गाळा बंद करण्याचा इशारा बाजार समितीने दिल्यानंतर त्याला खडबडून जाग आली. त्यानंतर त्याने त्या शेतकऱ्याचे थकविलेले ४ लाख ८ हजार रुपये दिले आहेत. गुलटेकडी मार्केट यार्डात फळविभागात काश्‍मीरमधील श्रीनगर भागातील पुरकान भट या शेतकऱ्याने रॉयल फ्रूट एजन्सी नावाच्या गाळ्यावर नोव्हेंबर महिन्यात सफरचंदाच्या ९४२ पेट्यांची विक्री केली. मात्र, संबंधित अडत्यांकडून शेतकऱ्याचे सफरचंदाचे पैसे देण्यात आले नव्हते. वारंवार पैशांची मागणी करूनदेखील त्या अडत्याकडून पैसे देण्यास टाळाटाळ केली जात होती. याप्रकरणी त्या शेतकऱ्यांचे नातेवाईक महम्मद भट आणि अब्दुल खालिक यांनी बाजार समितीकडे तक्रार केली. त्याची दखल घेऊन समितीने  संबंधित अडत्याकडून पैसे वसूल करण्याची कारवाई सुरू केली. तसेच पैसे न दिल्यास गाळा बंद करण्याची तंबी दिल्यानंतर बुधवारी त्या अडत्याने बाजार समितीकडे पैसे जमा केले. त्यानंतर समितीने संबंधित शेतकऱ्याला डीडीव्दारे ते पैसे पाठवून दिले आहेत. बाजार समितीच्या आवारात शेतीमालाची विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे. अडत्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकविल्याची तक्रार समितीकडे आल्यानंतर तत्काळ कार्यवाही केली जाते. - बी. जे. देशमुख, प्रशासक, पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT