संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’मधून यंदा सहा हजार ६१ कामे पूर्ण

टीम अॅग्रोवन

नगर   ः शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानातून यंदा १४९ गावांत आतापर्यंत सहा हजार ६१ कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर सुमारे ६९ कोटी ९२ लाख रुपये खर्च झाले आहेत. यंदाच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या आराखड्यात १८४ कोटी ३७ लाख रुपयांची ६२६९ कामे प्रस्तावित केली आहेत. या कामांना मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. 

नगसह राज्यातील अनेक जिल्ह्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने दुष्काळाशी सामना केला आहे. त्यामुळे टंचाईशी सामना करणाऱ्या व गेली काही वर्षे टॅंकरने पाणीपुरवठा होत असलेल्या गावांत पाणी साठवण क्षमता वाढावी, यासाठी शासनाने २०१५ पासून सिंचनाच्या विविध योजनांचा ताळमेळ घालत जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. अभियानात लोकसहभाग वाढून चांगली कामे झाली असल्याने त्याचा अनेक गावांना फायदाही होत आहे.

यंदाच्या वर्षी निवड झालेल्या गावांत कामे करण्यासाठी १८४ कोटी ३७ लाख रुपयांचा आराखडा केला आणि त्यानुसार ६२६९ कामे प्रस्तावित केली होती. त्या सर्व कामांना प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता देण्यात आली. ४७५४ कामांच्या निविदा काढण्याची गरज होती. त्यानुसार त्यांच्या निविदांची प्रक्रिया पूर्ण झाली. १५१० कामांच्या निविदा काढण्याची गरज पडली नाही. प्रस्तावित सर्व कामांना कार्यारंभ आदेशही दिले आणि सर्व कामे सुरूही झाली. त्यातील आतापर्यंत ६०६१ कामे पूर्ण झाली आहेत.  

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार पालकमंत्री राम शिंदे यांच्या जामखेड तालुक्यातील कामांची माहिती मात्र उपलब्ध नाही. जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांतून अनेक गावांना चांगला फायदा झालेला असला तरी, मागील काही वर्षांत जलयुक्त शिवार अभियानातील कामांबाबत तक्रारीही झाल्या होत्या, त्याचे पुढे काय झाले. याबाबत मात्र कृषी विभागाकडून सांगितले जात नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT